शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू आजारावर प्रतिबंध हाच  उपाय- शिवराज चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 17:42 IST

जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद... 

- संदीप वानखडे   बुलडाणा : दरवर्षी पावसाळ््यात डेंग्यूसह इतर जलजन्य आजारांची साथ पसरते. यावर्षी कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना संसर्ग थांबविण्याकडे असल्याने डेग्यू, मलेरिया या आजारांकडे दुर्लक्ष होतेय का, या आजारांना रोखण्यासाठी काय उपाय योजना करण्यात येत आहेत, याविषयी जिल्हा हिवताप अधिकारी  शिवराज चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद... 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांकडे दुर्लक्ष होत आहे का?  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही डेंग्यू व इतर आराजांच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज आहे. डेंग्यू रोखण्यासाठी आम्ही तीन महिन्यांचा प्लान तयार करून त्यानुसार काम करीत आहोत. 

जिल्ह्यात आतापर्यंत डेग्यूंचे किती रुग्ण आहेत? जिल्ह्यात आतापर्यंत १५ रुग्णांची नोंद आहे. वर्षभरात मे-जून महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. तेव्हा उपाय योजना केल्याने डेंग्यूच्या रुग्णांची वाढ थांबली आहे. यापुढेही विभागाच्या वतीने विविध उपाय योजना केल्या आहेत.त्यामध्ये सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.  

डेंग्यु थांबविण्यासाठी काय उपाय योजना करण्यात येत आहेत? तीन महिन्यांचा अ‍ॅक्शन प्लॉन तयार करून डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. तसेच ज्या गावांमध्ये रुग्ण आढळले, त्या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. आतापर्यंत हॉटस्पॉट ठरलेल्या जवळपास सर्वच गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. काही गावांमध्ये सर्वेक्षण थांबलेले आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच  खासगी लॅब,हॉस्पीटलला भेट देउन डेंग्यू रुग्णांविषयी माहिती घेण्यात येत आहे. प्रतिबंध हाच एकमेव उपाय असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी घरात स्वच्छ पाणी उघड्यावर ठेवूच नये. तसेच पावसाळ््यात उत्पत्ती स्थाने वाढल्याने एडीस डासांची निर्मीती  होते. त्यामुळे, धोका जास्त असतो. 

एडीस डासांविषयी काय सांगाल? एडीस डास पाच ते सहा मिमी लांबीचा असतो. अंगावर पांढरे चट्टे असतात. हा डास स्वच्छ पाण्यातच वाढतो. त्यामुळे, पाण्याची भांडी, ड्रम, रांजन व्यवस्थीत झाकून ठेवावे. खराब टायर्स नष्ट करावे. आठवड्यातून प्रत्येक शनिवार कोरडा दिवस पाळावा. डेंग्यूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असतो. कारण त्यांची प्रतीकार शक्ती कमी असते. त्यामुळे, एडीस किंवा इतर मच्छर घरात येणारच नाही, अशी खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी सतर्क रहावे.

प्रतिबंध हाच एकमेव उपाय असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी घरात स्वच्छ पाणी उघड्यावर ठेवूच नये. तसेच पावसाळ््यात उत्पत्ती स्थाने वाढल्याने एडीस डासांची निर्मीती होते. त्यामुळे, धोका जास्त असतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdengueडेंग्यू