शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

जीवीत हानी टाळण्यासाठी वीज 'अरेस्टर' बसवावेत - बुधवत यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 14:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जीवन सुरक्षा हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आकाशातून कोसळणाऱ्या वीजांपासून मानव गुरांची जीवीतहानी होण्याचे प्रकार घडत असतात. पावसाळ््यात त्याची अनेकदा पुनर्रावृत्ती होऊन वित्तीय व कधीही भरून न निघणारी जीवीत हानी होते. शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे ग्रामीण भागात वीज अरेस्टर बसविण्यात येऊन त्यासाठी जिल्हा नियोजन व ...

ठळक मुद्देअवकाळी पाऊस आणि वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अलिकडील काळात लक्षणीय वाढले आहे.ग्रामीण भागात वीज अरेस्टर बसविण्यात येऊन त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास आराखड्यात विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी केली आहे. मागणी ठरावरुपाने शासनाकडे करावी, जेणे करून जिल्हाभरात या प्रक्रियेला गती येईल असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जीवन सुरक्षा हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आकाशातून कोसळणाऱ्या वीजांपासून मानव गुरांची जीवीतहानी होण्याचे प्रकार घडत असतात. पावसाळ््यात त्याची अनेकदा पुनर्रावृत्ती होऊन वित्तीय व कधीही भरून न निघणारी जीवीत हानी होते. शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे ग्रामीण भागात वीज अरेस्टर बसविण्यात येऊन त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास आराखड्यात विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्याशी त्यांनी चर्चा ही केली आहे. अवकाळी पाऊस आणि वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अलिकडील काळात लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे वीज रोधक यंत्र बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनातंर्गतचा हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे बनला असल्याचे जालिंधर बुधवत यावेळी चर्चेत बोलताना म्हणाले. मध्यंतरी वीज पडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला होता. त्या पृष्ठभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे. ग्रामीणसोबतच शहरी भागातही हे प्रमाण आता वाढले आहे. डीपीसी आराखड्यातंर्गत ग्रामपंचायतींसाठीही त्यानुषंगाने तरतूद केली जावी, अशी बुधवत यांची मागणी आहे. या चर्चेदरम्यान उपजिल्हा प्रमुख संजय गायकवाड, किसान सेना उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, गजेंद्र दांदडे, आशिष जाधव, समाधान बुधवत, सुधाकर मुंढे, सचिन परांडे, किरण देशपांडे, बाळु धुड, उत्कर्ष डाफणे, शाम पवार, संजय ठाकरे, हरी सिनकर, नाना दांडगे, कुणाल गायकवाड, गिरीश आडेकर, गजानन भिंगारे उपस्थित होते.

ग्रामपंचायतने ठराव घेवून मागणी करावी

गावातील सभागृह, रस्ते, नाल्या यासाठी प्राधान्याने गावकरी मागणी करतात. परंतु जीवन-मरणाशी निगडित या प्रश्नावर काहीही होत नाही. वैज्ञानिक दृष्टीने हिताचा आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विज रोधक लावल्या जावू शकतात. याची तांत्रिक दृष्ट्या माहिती गावकऱ्यांनी घ्यावी. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीने विज रोधक बसविण्याची मागणी ठरावरुपाने शासनाकडे करावी, जेणे करून जिल्हाभरात या प्रक्रियेला गती येईल असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv SenaशिवसेनाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय