शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जीवीत हानी टाळण्यासाठी वीज 'अरेस्टर' बसवावेत - बुधवत यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 14:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जीवन सुरक्षा हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आकाशातून कोसळणाऱ्या वीजांपासून मानव गुरांची जीवीतहानी होण्याचे प्रकार घडत असतात. पावसाळ््यात त्याची अनेकदा पुनर्रावृत्ती होऊन वित्तीय व कधीही भरून न निघणारी जीवीत हानी होते. शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे ग्रामीण भागात वीज अरेस्टर बसविण्यात येऊन त्यासाठी जिल्हा नियोजन व ...

ठळक मुद्देअवकाळी पाऊस आणि वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अलिकडील काळात लक्षणीय वाढले आहे.ग्रामीण भागात वीज अरेस्टर बसविण्यात येऊन त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास आराखड्यात विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी केली आहे. मागणी ठरावरुपाने शासनाकडे करावी, जेणे करून जिल्हाभरात या प्रक्रियेला गती येईल असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जीवन सुरक्षा हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आकाशातून कोसळणाऱ्या वीजांपासून मानव गुरांची जीवीतहानी होण्याचे प्रकार घडत असतात. पावसाळ््यात त्याची अनेकदा पुनर्रावृत्ती होऊन वित्तीय व कधीही भरून न निघणारी जीवीत हानी होते. शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे ग्रामीण भागात वीज अरेस्टर बसविण्यात येऊन त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास आराखड्यात विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्याशी त्यांनी चर्चा ही केली आहे. अवकाळी पाऊस आणि वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अलिकडील काळात लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे वीज रोधक यंत्र बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनातंर्गतचा हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे बनला असल्याचे जालिंधर बुधवत यावेळी चर्चेत बोलताना म्हणाले. मध्यंतरी वीज पडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला होता. त्या पृष्ठभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे. ग्रामीणसोबतच शहरी भागातही हे प्रमाण आता वाढले आहे. डीपीसी आराखड्यातंर्गत ग्रामपंचायतींसाठीही त्यानुषंगाने तरतूद केली जावी, अशी बुधवत यांची मागणी आहे. या चर्चेदरम्यान उपजिल्हा प्रमुख संजय गायकवाड, किसान सेना उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, गजेंद्र दांदडे, आशिष जाधव, समाधान बुधवत, सुधाकर मुंढे, सचिन परांडे, किरण देशपांडे, बाळु धुड, उत्कर्ष डाफणे, शाम पवार, संजय ठाकरे, हरी सिनकर, नाना दांडगे, कुणाल गायकवाड, गिरीश आडेकर, गजानन भिंगारे उपस्थित होते.

ग्रामपंचायतने ठराव घेवून मागणी करावी

गावातील सभागृह, रस्ते, नाल्या यासाठी प्राधान्याने गावकरी मागणी करतात. परंतु जीवन-मरणाशी निगडित या प्रश्नावर काहीही होत नाही. वैज्ञानिक दृष्टीने हिताचा आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विज रोधक लावल्या जावू शकतात. याची तांत्रिक दृष्ट्या माहिती गावकऱ्यांनी घ्यावी. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीने विज रोधक बसविण्याची मागणी ठरावरुपाने शासनाकडे करावी, जेणे करून जिल्हाभरात या प्रक्रियेला गती येईल असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv SenaशिवसेनाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय