शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सामाजिक वनीकरणच्या नर्सरीत ५० लाख रोपे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:29 IST

१७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यासाठी ८२ लाख ४० हजार १५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सामाजिक वनीकरण विभागाने १७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली.वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे. वृक्षतोड सर्रास होत असल्याने जमिनीवरील वृक्षांचे अच्छादन कमालीचे कमी झाले आहे. परिणामी अनियमीत व बेभरवशाचा पावसाळा सुरु झाला आहे. कधी नव्हे असे वाढीव तापमान यावर्षी अनुभवायला मिळाले आहे. निसर्गचक्र कायम ठेवण्यासाठी सन २०१६ मध्ये राज्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. जिल्ह्यास १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले गेले. हे उद्दिष्ट पार पाडल्यानंतर २०१७ मध्ये राज्यात १३ कोटी तर जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० वृक्ष लागवड झाली. २०१८ मध्ये राज्यात ३३ कोटी व जिल्ह्यात ४४९५३७ वृक्ष लागवड चळवळ हाती घेतली गेली. तर यावर्षी ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यासाठी ८२ लाख ४० हजार १५० रोपे लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत सामाजिक वनीकरणच्या जिल्ह्यातील १७ नर्सरीमध्ये ५० लाख रोपे तयार झाली आहे.प्रशासन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून रोपांची लागवड करण्यात गुंतून गेले आहे. शासनाचे विविध विभाग आणि सर्वच कर्मचारी वृक्षारोपण करणार आहेत. यासाठी आता केवळ ३० ते ४० दिवसांचा अवधी उरला आहे. सामाजिक वनीकरणने आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केली आहे. यातील काही रोपे ४ फुटांपर्यंत वाढली आहेत. जिल्ह्याचे तापमान कमालीचे वाढले असतानाही कोवळी रोपे चांगले तग धरुन आहेत. वृक्ष लागवड मोहिम सुरु झाल्यावर नर्सरीमधील रोपे जिल्हाभर वाटप करण्यात येतील. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग