शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सामाजिक वनीकरणच्या नर्सरीत ५० लाख रोपे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:29 IST

१७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यासाठी ८२ लाख ४० हजार १५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सामाजिक वनीकरण विभागाने १७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली.वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे. वृक्षतोड सर्रास होत असल्याने जमिनीवरील वृक्षांचे अच्छादन कमालीचे कमी झाले आहे. परिणामी अनियमीत व बेभरवशाचा पावसाळा सुरु झाला आहे. कधी नव्हे असे वाढीव तापमान यावर्षी अनुभवायला मिळाले आहे. निसर्गचक्र कायम ठेवण्यासाठी सन २०१६ मध्ये राज्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. जिल्ह्यास १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले गेले. हे उद्दिष्ट पार पाडल्यानंतर २०१७ मध्ये राज्यात १३ कोटी तर जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० वृक्ष लागवड झाली. २०१८ मध्ये राज्यात ३३ कोटी व जिल्ह्यात ४४९५३७ वृक्ष लागवड चळवळ हाती घेतली गेली. तर यावर्षी ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यासाठी ८२ लाख ४० हजार १५० रोपे लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत सामाजिक वनीकरणच्या जिल्ह्यातील १७ नर्सरीमध्ये ५० लाख रोपे तयार झाली आहे.प्रशासन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून रोपांची लागवड करण्यात गुंतून गेले आहे. शासनाचे विविध विभाग आणि सर्वच कर्मचारी वृक्षारोपण करणार आहेत. यासाठी आता केवळ ३० ते ४० दिवसांचा अवधी उरला आहे. सामाजिक वनीकरणने आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केली आहे. यातील काही रोपे ४ फुटांपर्यंत वाढली आहेत. जिल्ह्याचे तापमान कमालीचे वाढले असतानाही कोवळी रोपे चांगले तग धरुन आहेत. वृक्ष लागवड मोहिम सुरु झाल्यावर नर्सरीमधील रोपे जिल्हाभर वाटप करण्यात येतील. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग