शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

ठोक्याची शेती झाली धोक्याची

By admin | Updated: July 18, 2015 02:10 IST

अनियमित पावसाचा फटका; शेती झाली तोट्याची.

खामगाव : शेती मालकाला योग्य मोबदला देऊन ३ ते ५ वर्षापर्यंत ठोक्याने शेतीचा करार केल्या जातो. खरिपासोबत रब्बी हंगामाचाही ठोका घेतला जातो. पीक परिस्थिती पाहून ठोक्याचे भाव बदलत जातात. काही ठिकाणी संस्थानची तसेच वैयक्तिक स्वरूपाची शेती ठोका पद्धतीने देणे चालू आहे. शेतीचा दर्जा पाहून ठोका ठरविला जातो. साधारणत: ६ ते ७ हजार रुपये एकरप्रमाणे ठोक्याने शेती केली जाते; परंतु गेल्या तीन वर्षांंपासून निसर्गचक्रच पूर्णत: बिघडले असून, पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ऐन पेरणीनंतर पाऊस दडी मारत असल्याने शेतीपिकाला फटका बसत आहे. ठोक्याने शेती करून शेती मालकाला नगदी स्वरूपात मोबदला दिला जातो. यानंतर शेतीची नांगरणी, वखरणी, पेरणी, बी-बियाणे, खते, पेरणी, कीटकनाशक फवारणी तसेच पीक काढणीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत ठोक्याचा मोबदला व शेतीचा खर्च वजा करता शेती करणार्‍याला नफा होण्याची आशा असते; मात्र अत्यल्प पावसाने सारे गणित बिघडले आहे. गतवर्षी पेरणीनंतर पावसाने दीड ते दोन महिने दडी मारली होती. त्यामुळे शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागला. गतवर्षी ६ ते ७ हजार रुपये ठोका यावर्षी ३ हजारावर येऊन ठेपला. काही शेतकर्‍यांनी तर ठोक्याने शेती नकोच बाबा अशी भूमिका घेतली आहे. पावसाची अनियमित स्थिती राहिली तर शेती करण्यास शेतकरी सक्षम राहणार नसल्याची स्थिती निर्माण होणार आहे. बँकेचे कर्ज वा इतरत्र जुळवाजुळव शेतकर्‍यांना भेडसावत आहे. स्वत:च्या शेतीबरोबर ठोक्याची शेतीही धोक्याची झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.