शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ठोक्याची शेती झाली धोक्याची

By admin | Updated: July 18, 2015 02:10 IST

अनियमित पावसाचा फटका; शेती झाली तोट्याची.

खामगाव : शेती मालकाला योग्य मोबदला देऊन ३ ते ५ वर्षापर्यंत ठोक्याने शेतीचा करार केल्या जातो. खरिपासोबत रब्बी हंगामाचाही ठोका घेतला जातो. पीक परिस्थिती पाहून ठोक्याचे भाव बदलत जातात. काही ठिकाणी संस्थानची तसेच वैयक्तिक स्वरूपाची शेती ठोका पद्धतीने देणे चालू आहे. शेतीचा दर्जा पाहून ठोका ठरविला जातो. साधारणत: ६ ते ७ हजार रुपये एकरप्रमाणे ठोक्याने शेती केली जाते; परंतु गेल्या तीन वर्षांंपासून निसर्गचक्रच पूर्णत: बिघडले असून, पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ऐन पेरणीनंतर पाऊस दडी मारत असल्याने शेतीपिकाला फटका बसत आहे. ठोक्याने शेती करून शेती मालकाला नगदी स्वरूपात मोबदला दिला जातो. यानंतर शेतीची नांगरणी, वखरणी, पेरणी, बी-बियाणे, खते, पेरणी, कीटकनाशक फवारणी तसेच पीक काढणीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत ठोक्याचा मोबदला व शेतीचा खर्च वजा करता शेती करणार्‍याला नफा होण्याची आशा असते; मात्र अत्यल्प पावसाने सारे गणित बिघडले आहे. गतवर्षी पेरणीनंतर पावसाने दीड ते दोन महिने दडी मारली होती. त्यामुळे शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागला. गतवर्षी ६ ते ७ हजार रुपये ठोका यावर्षी ३ हजारावर येऊन ठेपला. काही शेतकर्‍यांनी तर ठोक्याने शेती नकोच बाबा अशी भूमिका घेतली आहे. पावसाची अनियमित स्थिती राहिली तर शेती करण्यास शेतकरी सक्षम राहणार नसल्याची स्थिती निर्माण होणार आहे. बँकेचे कर्ज वा इतरत्र जुळवाजुळव शेतकर्‍यांना भेडसावत आहे. स्वत:च्या शेतीबरोबर ठोक्याची शेतीही धोक्याची झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.