शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

ठोक्याची शेती झाली धोक्याची

By admin | Updated: July 18, 2015 02:10 IST

अनियमित पावसाचा फटका; शेती झाली तोट्याची.

खामगाव : शेती मालकाला योग्य मोबदला देऊन ३ ते ५ वर्षापर्यंत ठोक्याने शेतीचा करार केल्या जातो. खरिपासोबत रब्बी हंगामाचाही ठोका घेतला जातो. पीक परिस्थिती पाहून ठोक्याचे भाव बदलत जातात. काही ठिकाणी संस्थानची तसेच वैयक्तिक स्वरूपाची शेती ठोका पद्धतीने देणे चालू आहे. शेतीचा दर्जा पाहून ठोका ठरविला जातो. साधारणत: ६ ते ७ हजार रुपये एकरप्रमाणे ठोक्याने शेती केली जाते; परंतु गेल्या तीन वर्षांंपासून निसर्गचक्रच पूर्णत: बिघडले असून, पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ऐन पेरणीनंतर पाऊस दडी मारत असल्याने शेतीपिकाला फटका बसत आहे. ठोक्याने शेती करून शेती मालकाला नगदी स्वरूपात मोबदला दिला जातो. यानंतर शेतीची नांगरणी, वखरणी, पेरणी, बी-बियाणे, खते, पेरणी, कीटकनाशक फवारणी तसेच पीक काढणीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत ठोक्याचा मोबदला व शेतीचा खर्च वजा करता शेती करणार्‍याला नफा होण्याची आशा असते; मात्र अत्यल्प पावसाने सारे गणित बिघडले आहे. गतवर्षी पेरणीनंतर पावसाने दीड ते दोन महिने दडी मारली होती. त्यामुळे शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागला. गतवर्षी ६ ते ७ हजार रुपये ठोका यावर्षी ३ हजारावर येऊन ठेपला. काही शेतकर्‍यांनी तर ठोक्याने शेती नकोच बाबा अशी भूमिका घेतली आहे. पावसाची अनियमित स्थिती राहिली तर शेती करण्यास शेतकरी सक्षम राहणार नसल्याची स्थिती निर्माण होणार आहे. बँकेचे कर्ज वा इतरत्र जुळवाजुळव शेतकर्‍यांना भेडसावत आहे. स्वत:च्या शेतीबरोबर ठोक्याची शेतीही धोक्याची झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.