शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खामगाव नगर पालिका स्वच्छता विभागाचा प्रताप

By admin | Updated: July 12, 2014 22:27 IST

विसर्जीत मूर्ती व निर्माल्य फेकल्या जातेय कचर्‍यात

खामगाव: गणेशोत्सवानंतर अनंत चतुदश्रीला विसर्जीत झालेल्या गणेश मूर्ती आणि निर्माल्यांची विल्हेवाट लावताना नगर पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विसर्जीत गणेश मूर्ती आणि निर्माल्याला नगर पालिका प्रशासन चक्क कचर्‍यासारखीच वागणूक देत असल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत उघडकीस आले. स्वच्छतेच्या नावावर दोन दिवसांपूर्वी विहिरीत निर्माल्य आणि अर्धवट मूर्ती जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आल्या. या मूर्ती आणि निर्माल्य एका ट्रकद्वारे ' कचरा'  म्हणून फेकून देण्यात आले. पालिकेच्या या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मोठय़ा मूर्तीसह, काही घरगुती गणेश मूर्तींचेही विसर्जन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील मोठय़ा विहिरीत करण्यात येते. विविध देवी देवतांच्या मूर्तीसह अनेक महिला भाविक या विहिरीत नियमित निर्माल्यांचे विसर्जन करतात. शहरात देवी-देवतांच्या मूर्ती विसर्जनाची दुसरी पर्यायी जागा नाही. त्यामुळे या विहिरीतच निर्माल्य आणि मूर्तींचे विसर्जन केल्या जाते. दरम्यान, स्वच्छतेच्या नावावर शुक्रवारी नगर पालिका प्रशासनाकडून अर्धवट जिरलेल्या गणेश मूर्ती आणि काही निर्माल्य जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. एका ट्रकद्वारे हे निर्माल्य रावणटेकडी परिसरातील खुल्या जागेवर फेकून देण्यात आले. या ठिकाणीच नगर पालिका प्रशासनाकडून शहरातील इतर कचरा फेकल्या जातो. या कचर्‍यावरच निर्माल्य आणि अर्धवट मूर्ती फेकण्यात आल्यामुळे शहरातील गणेशभक्त आणि नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड चिड व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने निर्माल्या सारख्या वस्तूंची व्यवस्थित विल्हेवाट लावायला हवी होती.** शहरात कचर्‍याचे जागोजागी ढिग !शहरात जागोजागी कचर्‍याचे ढिग साचले आहेत. या कचर्‍यांबाबत वारंवार ओरड करूनही नगर पालिका प्रशासनाकडून दखल घेतल्या जात नाही. या कचर्‍याबाबत तक्रार निवेदनही नागरिकांनी सादर केली आहेत. मात्र, हा कचरा साफ केल्या जात नाही. याऊलट गणेशोत्सवाला दोन-तीन महिन्यांचा कालावधी असतानाही विहिर स्वच्छ करण्याचे औचित्य काय? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.