शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांना वीज देता का वीज?

By admin | Updated: April 5, 2016 01:47 IST

बुलडाणा जिल्ह्यात दहा हजार शेतकरी कृषीपंपासाठी विजेच्या प्रतीक्षेत.

राजेश शेगोकार/बुलडाणाराज्य शासनाने कृषिपंपांच्या विद्युत जोडणीचे अर्ज ३१ मार्च २0१६ पर्यंत निकाली काढण्याची केलेली घोषणा हवेत विरल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत कृषिपंपांच्या वीज जोडणीचे तब्बल ९ हजार ५५९ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकर्‍यांना कृषिपंपांसाठी वीज देता का वीज? असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे. आधीच दुष्काळ असल्यामुळे शेतीचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे. त्यामुळे शेतात असलेल्या पाण्याच्या भरवशावर काही उत्पादन घ्यावे, भाजीपाला पिकवावा हे स्वप्नही विद्युत पुरवठा मिळत नसल्याने भंगले आहे. शेतकर्‍यांनी जोडणीसाठी भरलेली रक्कमही (कोटेशन) अडकून पडली आहे. मात्र, गतवर्षी प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १0 हजार ३६0 शेतकर्‍यांनी कृषिपंपांसाठी महावितरणकडे पैसे भरले होते. त्यापैकी १0 हजार २४४ शेतकर्‍यांना कृषिपंप जोडणी दिल्याचा दावा महावितरणने केला. मात्र, तरीही ९ हजार ५५९ शेतकर्‍यांचे अर्ज प्रलंबित आहेत. गतवर्षी अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन समाधानकारक झाले नव्हते. मशागत व लागवडीसाठी शेतकर्‍यांनी कर्ज काढले, प्रसंगी संपूर्ण कुटुंबच शेतात राबले. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे बहुतांश शेतकर्‍यांचा लागवड व मशागतीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे पाण्याची सोय असलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी कंबर कसली. कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा उपलब्ध होईल, या आशेवर राहिलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली. विद्युत जोडणीअभावी सिंचनामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांमधून होत आहे. अनेक शेतकर्‍यांचे विद्युत जोडणीसाठीचे अर्ज निकाली निघाले नाहीत. शेतकर्‍यांकडून विद्युत जोडणीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येतो. रब्बी हंगामामध्ये वीज जोडणी मिळाली असती तर कांदा, गहू, भुईमुंगाचे लाखो रुपयांचे उत्पन्न घेता आले असते. मात्र, सध्या जोडणी असलेल्या कृषिपंपांवर विजेचा दाब मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. विद्युत जोडणी न मिळालेल्या शेतकर्‍यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींनाही साकडे घातले, मात्र तरीही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता शासनानेच विद्युत जोडणीचे अर्ज निकाली निघण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.