शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

कृषिपंपांना वीज देता का वीज?

By admin | Updated: April 5, 2016 01:47 IST

बुलडाणा जिल्ह्यात दहा हजार शेतकरी कृषीपंपासाठी विजेच्या प्रतीक्षेत.

राजेश शेगोकार/बुलडाणाराज्य शासनाने कृषिपंपांच्या विद्युत जोडणीचे अर्ज ३१ मार्च २0१६ पर्यंत निकाली काढण्याची केलेली घोषणा हवेत विरल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत कृषिपंपांच्या वीज जोडणीचे तब्बल ९ हजार ५५९ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकर्‍यांना कृषिपंपांसाठी वीज देता का वीज? असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे. आधीच दुष्काळ असल्यामुळे शेतीचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे. त्यामुळे शेतात असलेल्या पाण्याच्या भरवशावर काही उत्पादन घ्यावे, भाजीपाला पिकवावा हे स्वप्नही विद्युत पुरवठा मिळत नसल्याने भंगले आहे. शेतकर्‍यांनी जोडणीसाठी भरलेली रक्कमही (कोटेशन) अडकून पडली आहे. मात्र, गतवर्षी प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १0 हजार ३६0 शेतकर्‍यांनी कृषिपंपांसाठी महावितरणकडे पैसे भरले होते. त्यापैकी १0 हजार २४४ शेतकर्‍यांना कृषिपंप जोडणी दिल्याचा दावा महावितरणने केला. मात्र, तरीही ९ हजार ५५९ शेतकर्‍यांचे अर्ज प्रलंबित आहेत. गतवर्षी अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन समाधानकारक झाले नव्हते. मशागत व लागवडीसाठी शेतकर्‍यांनी कर्ज काढले, प्रसंगी संपूर्ण कुटुंबच शेतात राबले. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे बहुतांश शेतकर्‍यांचा लागवड व मशागतीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे पाण्याची सोय असलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी कंबर कसली. कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा उपलब्ध होईल, या आशेवर राहिलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली. विद्युत जोडणीअभावी सिंचनामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांमधून होत आहे. अनेक शेतकर्‍यांचे विद्युत जोडणीसाठीचे अर्ज निकाली निघाले नाहीत. शेतकर्‍यांकडून विद्युत जोडणीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येतो. रब्बी हंगामामध्ये वीज जोडणी मिळाली असती तर कांदा, गहू, भुईमुंगाचे लाखो रुपयांचे उत्पन्न घेता आले असते. मात्र, सध्या जोडणी असलेल्या कृषिपंपांवर विजेचा दाब मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. विद्युत जोडणी न मिळालेल्या शेतकर्‍यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींनाही साकडे घातले, मात्र तरीही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता शासनानेच विद्युत जोडणीचे अर्ज निकाली निघण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.