शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

वारीच्या धरणावरील वीज निर्मिती संच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:16 IST

सद्यास्थिती या वीज निर्मिती संचावर दररोज ८ ते १० तास वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेले वारी येथील हनुमान सागर धरणावर वीज निर्मिती संच २५ जून रोजी सुरू करण्यात आले आहे. गत १३ वषार्पासून धरणातील पाण्याची पातळी प्रमाणे वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. या वीज निर्मिती संचाची क्षमता १ हजार ५०० किलो वॅट असून सध्या स्थिती १ हजार किलो वॅट विद्युत निर्मिती करण्यात येत आहे.या विद्युत संचाची क्षमता दररोज ३६ हजार युनिटची आहे. यामधून दररोज २० ते २५ हजार युनिट जनरेट होत आहेत. येथून अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील उपकेंद्राला विद्यूत पुरवठा करण्यात येत आहे. गत तेरा वषार्पासून धरणातील पाण्याची पातळीप्रमाणे हे विद्युत निर्मिती अबाधित सुरू आहे. वारी येथील हनुमान सागर धरणाची समुद्रसपाटीपासून उंची ४०३.५१ मिटर असून सध्या स्थिती या धरणात ४१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या विद्यूत निर्मिती संचाची प्रथम चाचणी २७ फेब्रुवारी २००७ रोजी करण्यात आली होती. प्रत्यक्ष वीज निर्मितीला १३ आॅगस्ट २००७ पासून प्रारंभ करण्यात आला. २६ जून २०२० पर्यंत या संचावरून १ कोटी १८ लाख ६२ हजार ८६० यूनिट वीज तयार करण्यात आली आहे. यावषीर्ही जलसाठ्याप्रमाणे वीज निर्मिती करण्यात येणार आहे. सद्यास्थिती या वीज निर्मिती संचावर दररोज ८ ते १० तास वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.

धरणातून शेकडो गावांना पिण्यासाठी पाणीवारी हनुमान येथील हनुमान सागर धरणावरून अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १४० गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील गावांना जलवाहिनीच्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू आहे. तर शेगाव शहरालाही पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरWan Projectवान प्रकल्प