शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे ठरताहेत अपघातास कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:33 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या विस्तारीकरणाचे काम मागील काही महिन्यापासून थांबले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर खामगाव ते नांदुरा मार्गावर जागोजागी खड्डे पडले असून यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राजकीय, सामाजिक संघटनांकडून वारंवार रस्त्याच्या डागडुजीची मागणी होत असल्यानंतरही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.गत दीड वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथगतिने सुरु आहे. रस्त्याचे बांधकामास गती यावी यासाठी गावकऱ्यांनी सुद्धा वाहने थांबवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली मात्र रस्त्याचे काम ‘आयएलएफएस’ कंपनीनेच बंद केल्याचे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पावसाळ््याचे दिवस असून रस्त्यातील खड्यामुळे किरकोळ अपघात घडत आहेत. शिवाय या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने दखल घेवून रस्त्याची डागडूजी करणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)मातीमिश्रीत मुरुम टाकून थातूरमातूर डागडूचीखामगाव ते नांदुरा या मार्गावरील खड्डे बुजवण्याची ओरड होत होती. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजवण्याचे काम नागपूरच्या अवजारे कंपनीला दिले आहे. मात्र खडड्े बुजवण्याचे काम सुद्धा निकृष्टदर्जाचे सुरु असल्याचे दिसून आले. खडड्यांमध्ये मातीमिश्रीत मुरुम टाकला जात आहे. यामुळे रस्त्यावर चिखल होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या विस्तारीकरणाचे काम मागील काही महिन्यापासून थांबले आहे. मात्र पावसाळयात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्त्याची डागडूजी सुरु झाली आहे. नागपूरच्या अवजारे कंपनीला हे काम दिले आहे. हे काम तात्पुरते आहे. काही दिवसातच राष्ट्रीय महामार्गाच्याविस्तारीकरणाचे काम सुरु होईल.- विलास ब्राम्हणकर,प्रकल्प संचालक,महामार्ग प्राधिकरण, अमरावती.

टॅग्स :khamgaonखामगावNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6