शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचारांनी सर्व समस्या कायमच्या मिटतात ! -  श्री श्री रविशंकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 16:40 IST

 संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रवीशंकर यांनी स्पष्ट केले.

खामगाव: इर्षा, द्वेषभाव आणि वाढत्या अपेक्षांमुळे आपलुकी लोप पावली आहे. समाजातील वाढती स्पर्धा ही देखील तणावाचे एक निश्चित कारण मानल जाते.  मात्र,  संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रवीशंकर यांनी स्पष्ट केले.

संकटांना घाबरून कुणाचेही भलं नाही. देशातील मोठंमोठे उद्योगपती कर्जबाजारी आहेत. तिथे सामान्य आणि शेतकºयांच्या अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी! तथापि, निराशेचे कारण कोणतेही असले तरी, कुणीही आपला लाख मोलाचा जीव गमवू नये, असा उपदेशही त्यांनी दिला. देशातीलच नव्हे तर विदेशातही तणावमुक्तीसाठी आर्ट आॅफ लिव्हींग परिवाराची धडपड सुरू असल्याचे ते म्हणाले.  ‘गुरूपावली’सोहळ्यासाठी ते खामगाव येथे आले असता, ‘लोकमत’शी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. 

 समाजातील आत्महत्या वाढीस लागण्याचे कारण काय?

- वाढत्या स्पर्धेमुळे युवकाच्या तर नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढीस लागल्याचे दिसून येते. घरगुती कलहामुळे अनेकांच्या जीवनात तणाव वाढीस लागतात. त्यामुळे ‘टोका’चे पाऊल उचलणारांची संख्या वाढीस लागल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मात्र, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे; विचारी मना तूच शोधुनी पाहे’ या उक्तीने प्रत्येकाने संकटाला आणि तणावाला सामोरे जावे. 

 ‘आर्ट आॅफ लिव्हींग’च्या प्रयत्नांमुळे समाजात सकारात्मक परिणाम जाणवतात का? 

- निश्चितच, समाजातील प्रत्येकाच्या तणावमुक्तीसाठी  ‘आर्ट आॅफ लिव्हींग’च्या माध्यमातून सन १९८१ पासून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ४१ कोटींहून अधिक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आलेत. प्रत्येक व्यक्ती आणि समाजातील शेवटचा घटक तणावमुक्त व्हावा, नैराश्य आणि हिंसकवृत्तीतून बाहेर यावा, यासाठी ‘आर्ट आॅफ लिव्हींग’परिवार प्रयत्नशील आहे. 

 आर्ट आॅफ लिव्हींग परिवाराच्या सामाजिक योगदानाबद्दल काय सांगाल!

- संगीत, ध्यान आणि साधनेद्वारे तणावमुक्त समाजाची निर्मिती हे आर्ट आॅफ लिव्हींग परिवाराचे प्रमुख लक्ष्य आहे. मात्र, संस्कारशील समाज आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी सर्व सामाजिक स्तरांमध्ये तंटामुक्ती, नैसर्गिक आपत्ती निवारण, सर्व शिक्षा अभियान, निसर्ग संवर्धन आणि स्त्री सबलीकरणातही या परिवाराचे मोठं योगदान आहे. पाणलोट, जलसिंचनासोबतच सेंद्रीय शेतीवर ‘आर्ट आॅफ लिव्हींग’ परिवाराने लक्ष्य केंद्रीत केले आहे.

 वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनासंदर्भात काय सांगाल!

- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह देशात विविध ठिकाणी पाणलोट क्षेत्रावर भर दिल्या जात आहे. ‘प्रकल्प भारत’अभियानांतर्गत सेंद्रीय शेती आणि युवकांना उद्योजकतेचे धडेही दिल्या जात आहे. ‘कौशल्य’विकास कार्यक्रमांवरही या परिवाराचा भर राहील. आगामी काळात जापान येथे होणाºया आॅलम्पिक स्पर्धांसाठी आर्ट आॅफ लिव्हींग संस्था पाच हजार युवकांना कौशल्य विकासाचे धडे देणार आहे. 

 युवापिढीसाठी आपला संदेश काय?

- संयम, तृप्ती आणि कृतार्थता या त्रिसुत्रीचा अंगीकार केल्यास, जीवनात परिपूर्णता येते. युवकांनी स्वत:सोबतच आदर्श भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, जीवनात नैराश्य आल्यास ‘आर्ट आॅफ लिव्हींग’ परिवाराशी संलग्न व्हावे. सर्वप्रकारच्या व्यसनांचा त्याग करावा. समर्पण भावनेने आई-वडील, गुरूजन, समाज आणि पर्यायाने देशाची सेवा करावी!

टॅग्स :khamgaonखामगावArt of Livingआर्ट आॅफ लिव्हिंगinterviewमुलाखत