शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचारांनी सर्व समस्या कायमच्या मिटतात ! -  श्री श्री रविशंकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 16:40 IST

 संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रवीशंकर यांनी स्पष्ट केले.

खामगाव: इर्षा, द्वेषभाव आणि वाढत्या अपेक्षांमुळे आपलुकी लोप पावली आहे. समाजातील वाढती स्पर्धा ही देखील तणावाचे एक निश्चित कारण मानल जाते.  मात्र,  संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रवीशंकर यांनी स्पष्ट केले.

संकटांना घाबरून कुणाचेही भलं नाही. देशातील मोठंमोठे उद्योगपती कर्जबाजारी आहेत. तिथे सामान्य आणि शेतकºयांच्या अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी! तथापि, निराशेचे कारण कोणतेही असले तरी, कुणीही आपला लाख मोलाचा जीव गमवू नये, असा उपदेशही त्यांनी दिला. देशातीलच नव्हे तर विदेशातही तणावमुक्तीसाठी आर्ट आॅफ लिव्हींग परिवाराची धडपड सुरू असल्याचे ते म्हणाले.  ‘गुरूपावली’सोहळ्यासाठी ते खामगाव येथे आले असता, ‘लोकमत’शी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. 

 समाजातील आत्महत्या वाढीस लागण्याचे कारण काय?

- वाढत्या स्पर्धेमुळे युवकाच्या तर नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढीस लागल्याचे दिसून येते. घरगुती कलहामुळे अनेकांच्या जीवनात तणाव वाढीस लागतात. त्यामुळे ‘टोका’चे पाऊल उचलणारांची संख्या वाढीस लागल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मात्र, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे; विचारी मना तूच शोधुनी पाहे’ या उक्तीने प्रत्येकाने संकटाला आणि तणावाला सामोरे जावे. 

 ‘आर्ट आॅफ लिव्हींग’च्या प्रयत्नांमुळे समाजात सकारात्मक परिणाम जाणवतात का? 

- निश्चितच, समाजातील प्रत्येकाच्या तणावमुक्तीसाठी  ‘आर्ट आॅफ लिव्हींग’च्या माध्यमातून सन १९८१ पासून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ४१ कोटींहून अधिक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आलेत. प्रत्येक व्यक्ती आणि समाजातील शेवटचा घटक तणावमुक्त व्हावा, नैराश्य आणि हिंसकवृत्तीतून बाहेर यावा, यासाठी ‘आर्ट आॅफ लिव्हींग’परिवार प्रयत्नशील आहे. 

 आर्ट आॅफ लिव्हींग परिवाराच्या सामाजिक योगदानाबद्दल काय सांगाल!

- संगीत, ध्यान आणि साधनेद्वारे तणावमुक्त समाजाची निर्मिती हे आर्ट आॅफ लिव्हींग परिवाराचे प्रमुख लक्ष्य आहे. मात्र, संस्कारशील समाज आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी सर्व सामाजिक स्तरांमध्ये तंटामुक्ती, नैसर्गिक आपत्ती निवारण, सर्व शिक्षा अभियान, निसर्ग संवर्धन आणि स्त्री सबलीकरणातही या परिवाराचे मोठं योगदान आहे. पाणलोट, जलसिंचनासोबतच सेंद्रीय शेतीवर ‘आर्ट आॅफ लिव्हींग’ परिवाराने लक्ष्य केंद्रीत केले आहे.

 वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनासंदर्भात काय सांगाल!

- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह देशात विविध ठिकाणी पाणलोट क्षेत्रावर भर दिल्या जात आहे. ‘प्रकल्प भारत’अभियानांतर्गत सेंद्रीय शेती आणि युवकांना उद्योजकतेचे धडेही दिल्या जात आहे. ‘कौशल्य’विकास कार्यक्रमांवरही या परिवाराचा भर राहील. आगामी काळात जापान येथे होणाºया आॅलम्पिक स्पर्धांसाठी आर्ट आॅफ लिव्हींग संस्था पाच हजार युवकांना कौशल्य विकासाचे धडे देणार आहे. 

 युवापिढीसाठी आपला संदेश काय?

- संयम, तृप्ती आणि कृतार्थता या त्रिसुत्रीचा अंगीकार केल्यास, जीवनात परिपूर्णता येते. युवकांनी स्वत:सोबतच आदर्श भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, जीवनात नैराश्य आल्यास ‘आर्ट आॅफ लिव्हींग’ परिवाराशी संलग्न व्हावे. सर्वप्रकारच्या व्यसनांचा त्याग करावा. समर्पण भावनेने आई-वडील, गुरूजन, समाज आणि पर्यायाने देशाची सेवा करावी!

टॅग्स :khamgaonखामगावArt of Livingआर्ट आॅफ लिव्हिंगinterviewमुलाखत