शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

आरओ प्लांटवर बंदची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:11 IST

Khamgaon News नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पर्यावरण, भूजल कायदा, आराेग्य मानकांचे पालन होत नसल्याच्या कारणामुळे आरआे प्लांट (रिव्हर्स आँस्मोसिस) पाणी शुध्दीकरण केंद्र  बंद करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई अद्याप सुरू झालेली नाही. लगतच्या काळात आरआे प्लांट बंद पडल्यास नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाने पाणी शुद्धीकरणाच्या आरओ केंद्रांना सील ठोकले जाण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात शेकडो आरआे (रिव्हर्स आसमोसिस) केंद्र आहेत. तेथे पाण्यावर प्रक्रिया कॅन किंवा जारमधून पाणी विकले जाते. पाच रुपयात २० लिटर पाणी देण्याचा हा व्यवसाय कित्येक वर्षांपासून सुरू आहे. जिल्ह्यात पाण्याचे मुबलक स्त्रोत असले तरी जिल्हावासियांना नियमित व शुद्ध पाणी अद्यापही उपलब्ध झाले नाही. त्यातच खारपाणपट्ट्यातील अनेक गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेकांना आरओच्या पाण्याची सवय लागली. मात्र दोन दिवसांपूर्वी हरित लवादाच्या निर्देशानंतर आरआे केंद्र बंद केली जाणार आहेत. काही ठिकाणी ही कारवाई सुरू झाली. मात्र, जिल्ह्यात अद्याप सुरूवात झालेली नाही. ती कारवाई केव्हाही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरओ केंद्र संचालकांचे धाबे दणाणले आहे. 

आरओ बंदची कारणेआरओ केंद्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो, मात्र त्यापैकी बहुतांश पाणी हे वेस्टेज असते. ते वाहून जाते परंतु त्याचे पुर्नभरण होत नाही. याशिवाय अन्न व औषध प्रशासनाची परवानगी, टीडीएसची योग्य मात्रा हवी. या बाबी पाळल्या जात नाहीत. n त्यातच आरओच्या पाण्यात टीडीएसची मात्रा किती प्रमाणात असावी, याबाबतही विविध मते व्यक्त केली जात आहेत.  गुणवत्तेनुसार पाण्याचे वितरण होत आहे किंवा नाही याची शहानिशा अन्न व औषधी प्रशासनाकडून केली जात नसल्याचा प्रकारही यापूर्वी घडला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावwater transportजलवाहतूक