शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

आरओ प्लांटवर बंदची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:11 IST

Khamgaon News नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पर्यावरण, भूजल कायदा, आराेग्य मानकांचे पालन होत नसल्याच्या कारणामुळे आरआे प्लांट (रिव्हर्स आँस्मोसिस) पाणी शुध्दीकरण केंद्र  बंद करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई अद्याप सुरू झालेली नाही. लगतच्या काळात आरआे प्लांट बंद पडल्यास नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाने पाणी शुद्धीकरणाच्या आरओ केंद्रांना सील ठोकले जाण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात शेकडो आरआे (रिव्हर्स आसमोसिस) केंद्र आहेत. तेथे पाण्यावर प्रक्रिया कॅन किंवा जारमधून पाणी विकले जाते. पाच रुपयात २० लिटर पाणी देण्याचा हा व्यवसाय कित्येक वर्षांपासून सुरू आहे. जिल्ह्यात पाण्याचे मुबलक स्त्रोत असले तरी जिल्हावासियांना नियमित व शुद्ध पाणी अद्यापही उपलब्ध झाले नाही. त्यातच खारपाणपट्ट्यातील अनेक गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेकांना आरओच्या पाण्याची सवय लागली. मात्र दोन दिवसांपूर्वी हरित लवादाच्या निर्देशानंतर आरआे केंद्र बंद केली जाणार आहेत. काही ठिकाणी ही कारवाई सुरू झाली. मात्र, जिल्ह्यात अद्याप सुरूवात झालेली नाही. ती कारवाई केव्हाही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरओ केंद्र संचालकांचे धाबे दणाणले आहे. 

आरओ बंदची कारणेआरओ केंद्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो, मात्र त्यापैकी बहुतांश पाणी हे वेस्टेज असते. ते वाहून जाते परंतु त्याचे पुर्नभरण होत नाही. याशिवाय अन्न व औषध प्रशासनाची परवानगी, टीडीएसची योग्य मात्रा हवी. या बाबी पाळल्या जात नाहीत. n त्यातच आरओच्या पाण्यात टीडीएसची मात्रा किती प्रमाणात असावी, याबाबतही विविध मते व्यक्त केली जात आहेत.  गुणवत्तेनुसार पाण्याचे वितरण होत आहे किंवा नाही याची शहानिशा अन्न व औषधी प्रशासनाकडून केली जात नसल्याचा प्रकारही यापूर्वी घडला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावwater transportजलवाहतूक