शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

बुलडाणा जिल्ह्यातील मुक्या प्राण्यांचे उन्हामुळे बेहाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:09 IST

बुलडाणा  : जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने  जिल्ह्यातील ६ लाख ३० हजार गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देसध्या जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश सेस्लिअसच्यावर राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून मानव विविध मार्गांनी आपला बचाव करून घेऊ शकतात; मात्र जनावरांना या कडक उन्हाचा फटका बसत आहे. वाढत असलेली उन्हाची तीव्रता, यामुळे  जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा  : जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने  जिल्ह्यातील ६ लाख ३० हजार गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. तळपत्या उन्हाचा पशुधनाला फटका बसत असून या कडाक्याच्या उन्हामुळे मुक्या प्राण्यांचे बेहाल होत आहेत. त्यामुळे उन्हाळी आजारांपासून  जनावरांना वाचविण्यासाठी लसिकरण मोहिम वेगाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.मे महिना उजाडल्यापासून जिल्ह्याचे तपामान दिवसेंदिवस वाढतच जात आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश सेस्लिअसच्यावर राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून मानव विविध मार्गांनी आपला बचाव करून घेऊ शकतात; मात्र जनावरांना या कडक उन्हाचा फटका बसत आहे. जिल्ह्यात गायवर्गीय गुरे सहा लाख ३० हजारांच्या आसपास आहेत. त्यातील ३० टक्के गुरे ही प्रजननक्षम असल्याने त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील जनावरांची रानोमाह भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची व ओल्या चाºयाची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे. गत आठवड्यामध्ये जिल्ह्यातील मलकापूर जवळ विषारी गवत खाण्यात आल्याने सात गायी दगावल्याचा प्रकार समोर आला होता; त्यात वाढत असलेली उन्हाची तीव्रता, यामुळे  जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. जिल्ह्यात उन्हाचा पार वाढत असल्याने जनावरे उष्माघाताचे बळी ठरत आहेत. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंश पर्यंत वाढते. यामूळे श्वसनाचा वेग व ह्रदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्त्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, जनावराचा तोल जाऊन जनावर कोसळणे, झटके येणे व जनावरे दगावण्याची भिती वाढली आहे. चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा फटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांसाठी पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. 

‘समर फिव्हर’चा धोका वाढलाउन्हाच्या या तिव्रतेमुळे जनावरांची प्रजनन क्षमता कमी होणे, वजन घटणे, अतिप्रखर सुर्यप्रकाशामुळे जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील तापमान वाढल्याने जनावरांना ‘समर फिव्हर’चा धोका वाढला आहे. ‘समर फिव्हर’पासून जनावरांची वेळीच काळजी घेणे गरजेचे झाले आहे. 

मोकाट जनावरे आजाराचे बळीचारा व पाणी टंचाईमुळे अनेक पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडत आहेत. शहरी भागातही अशी अनेक जनावरे मोकाट फिरताना दिसतात. या जनावरांना वेळेवर चारा व पाणी मिळत नसल्याने मोकाट जनावरे विविध आजारांचे बळी ठरत आहेत. चारा व पाण्याच्या शोधात फिरणाºया जनावरांना उन लागून झटके येणे व जनावराचा तोल जाऊन जनावर जमीनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. 

लसिकरणावर द्यावा लागणार भरउन्हामुळे जनावरांना आजाराचा धोका वाढला असून यासाठी पशुसंवर्धन विभागाला जनावरांच्या लसिकरणावर भर द्यावा लागणार आहे. मान्सून पूर्व लसिकरण मोहिमही या पाठोपाठ राबवावी लागणार असल्याने पशुसंवर्धन विभागाला आपल्या कामाचा वेग वाढविण्याची अवश्यकता आहे.

 वाढत्या उन्हामुळे जनावरांना विविध आजार उद्भवण्याची शक्यत असते. त्यामुळे पशुपालकांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरे सकाळी चारण्यासाठी सोडावी व उन्हाच्यावेळी सावलीत बांधावी. त्यानंतर त्यांना स्वच्छ पाणी द्यावे. कुठल्याही आजाराचे लक्ष आढळल्यास त्वरीत पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखवावे.- डॉ.आर.एम.शिंदे,  उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती