शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ग्रामीण भागात अशुद्ध पाणीपुरवठा!

By admin | Updated: March 28, 2017 01:42 IST

पाणी शुद्धीकरणाची व्यवस्थाच नाही; ४५ गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

नागेश मोहिते धाड, दि. २७- ग्रामीण भागात पाणीपुरवठा करीत असताना शुद्धीकरण करण्याची कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. बुलडाणा तालुक्यातील करडी, धाड, बोरखेड, सावळी, कुंबेफळ, सातगाव, कुलमखेड, डोमरूळ, टाकळी, ढालसांवगी, मासरूळ, शेकापूर, बोदेगाव यासह तेरा गावांमध्ये करडी सिंचन तलाव परिक्षेत्रातील विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो; मात्र पिण्याचे पाणी पुरविणार्‍या या विहिरींवर जलशुद्धीकरणाची यंत्रणा उभारण्यात आली नाही, त्यामुळे तेरा गावातील जनतेला अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. याबाबत माहिती असतानाही प्रशासनाने याबाबत तोडगा काढला नाही.जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून नजीकच पाच वर्षात प्रशासनाने जलस्वराज, महाजलसारख्या योजना गावोगावी दिल्या. लाखो रुपयाचे अनुदान यासाठी मंजूर केले; मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळाला नाही. प्रशासनाकडून मूलभूत व आवश्यक असणार्‍या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असताना, याकडे स्थानिक प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले. बुलडाणा तालुक्यात किमान ४५ गावापेक्षा अधिक गावांची अशीच स्थिती आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण्याकरिता धरण क्षेत्रात विहिरी खोदण्यात आल्या आहेत. या विहिरीमधून गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सदर पाणी शुद्ध करण्याकरिता केवळ पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात येते. या विहिरी उघड्या असून, त्यामध्ये कचरा पडला आहे, तसेच विहिरींमध्ये मोठय़ा प्रमाणात शेवाळ झाली आहे. या विहिरीतील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइनही जुनी असून, गंजली आहे. त्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.