शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात अशुद्ध पाणीपुरवठा!

By admin | Updated: March 28, 2017 01:42 IST

पाणी शुद्धीकरणाची व्यवस्थाच नाही; ४५ गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

नागेश मोहिते धाड, दि. २७- ग्रामीण भागात पाणीपुरवठा करीत असताना शुद्धीकरण करण्याची कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. बुलडाणा तालुक्यातील करडी, धाड, बोरखेड, सावळी, कुंबेफळ, सातगाव, कुलमखेड, डोमरूळ, टाकळी, ढालसांवगी, मासरूळ, शेकापूर, बोदेगाव यासह तेरा गावांमध्ये करडी सिंचन तलाव परिक्षेत्रातील विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो; मात्र पिण्याचे पाणी पुरविणार्‍या या विहिरींवर जलशुद्धीकरणाची यंत्रणा उभारण्यात आली नाही, त्यामुळे तेरा गावातील जनतेला अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. याबाबत माहिती असतानाही प्रशासनाने याबाबत तोडगा काढला नाही.जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून नजीकच पाच वर्षात प्रशासनाने जलस्वराज, महाजलसारख्या योजना गावोगावी दिल्या. लाखो रुपयाचे अनुदान यासाठी मंजूर केले; मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळाला नाही. प्रशासनाकडून मूलभूत व आवश्यक असणार्‍या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असताना, याकडे स्थानिक प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले. बुलडाणा तालुक्यात किमान ४५ गावापेक्षा अधिक गावांची अशीच स्थिती आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण्याकरिता धरण क्षेत्रात विहिरी खोदण्यात आल्या आहेत. या विहिरीमधून गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सदर पाणी शुद्ध करण्याकरिता केवळ पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात येते. या विहिरी उघड्या असून, त्यामध्ये कचरा पडला आहे, तसेच विहिरींमध्ये मोठय़ा प्रमाणात शेवाळ झाली आहे. या विहिरीतील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइनही जुनी असून, गंजली आहे. त्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.