शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पाकीटबंद पूरक पोषण आहार निकृष्ट दर्जाचा; मातेसह बालकांचे आरोग्य धोक्यात

By विवेक चांदुरकर | Updated: March 27, 2024 18:56 IST

निकृष्ट दर्जाचा पूरक आहार खाद्यान्न म्हणून दिला जात असल्यानेच बालकांमधील कूपोषण वाढत असल्याचा गंभीर आरोप गरोदर मातांकडून होत आहे

अझहर अली

संग्रामपूर: कुपोषणावर मात करण्यासाठी ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना वाटप करण्यात येत असलेला पाकीटबंद पूरक पोषण आहार निकुष्ट दर्जाचा असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या निकृष्ट पाकीट बंद पूरक पोषण आहारामूळे गरोदर स्तनदा मातांसह बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयामार्फत तालुक्यातील गरोदर माता व ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांसाठी पाकीटबंद पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, या पाकीटबंद धान्याचा पूरवठा निकृष्ट असल्याने शिजवल्यावर रंग काळा पडत आहे. त्यातून दुर्गंधी येत असल्याने गरोदर मातांसह बालकांच्या जीवाशी खेळण्याचा जीवघेणा प्रकार संग्रामपूर तालुक्यात आढळून आला आहे. संग्रामपूर तालूक्यात गरोदर स्तनदा मातांची संख्या १ हजार ८२३ असून ६ महिने ते ३ वर्षों वयोगटातील ५ हजार १६७ बालके आहेत. १७९ अंगणवाड्यांच्या माध्यमातून पाकीट बंद धान्याचे वाटप ५ हजार ३४१ लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. आहार शिजवल्यावर त्याचा रंग काळा पडत आहे. तसेच त्यातून दुर्गंधी येत असल्याने आहार खाण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

निकृष्ट दर्जाचा पूरक आहार खाद्यान्न म्हणून दिला जात असल्यानेच बालकांमधील कूपोषण वाढत असल्याचा गंभीर आरोप गरोदर मातांकडून होत आहे. या गंभीर प्रकाराबाबत संग्रामपूर येथील प्रभारी प्रकल्प अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

ग्रामीण भागात अंगणवाड्यांना पूरवठादारांकडून पाकीट बंद पूरक पोषण आहाराचे निकृष्ट धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. पाकीट बंद खाद्यान्न शिजवल्यावर त्याचा रंग काळा पडत असून त्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे. तो आहार जनावरांच्या देखील खाण्यायोग्य नाही. आहाराद्वारे गरोदर स्तनदा मातांसह बालकांच्या जिवाशी खेळणे तातडीने थांबविण्यात यावे. तसेच निकृष्ट धान्याचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल. - पंकज मिसाळ, तालूका उपाध्यक्ष, सरपंच संघटना संग्रामपूर