साखरखेर्डा (जि. बुलडाणा) : हजरत ख्वाजा गरीब नवाज (र.अ.) यांनी मानवतेची जडणघडण केली. इस्लाम धर्माचे मानव कल्याणाचे विचार सर्व जाती-धर्मापर्यंत पोहोचवले. ख्वाजा गरीब नवाज यांच्यामुळे मानव कल्याणाचे विचार जागतिक स्तरावर सर्वत्र पोहोचले, त्यातून सर्वधर्म समभावाची शिवकण मिळाली, असे सश्रद्ध विचार हजरत अल्लामा मौलाना फुरकान रजा यांनी व्यक्त केले.येथील कादरी मल्टीपर्पज मॉयनारिटी एज्युकेशन अँन्ड सोशल वेल्फेअर सोसायटीचे विद्यमाने ह्यजश्ने गरीब नवाजह्ण कार्यक्रम १५ एप्रिल रोजी संपन्न झाला. अताये रसूल गरीब नवाज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित या उत्सवाच्या अध्यक्षस्थानी हजरत मौलाना मतीऊरहेमान रिज्वी होते. प्रमुख अतिथी म्हणून हजरत मौलाना बाकीर अली, उपसरपंच रफीक प्यारे, शिक्षण समितीचे अध्यक्ष दाऊद कुरेशी, माजी ग्रा.पं. सदस्य मोहम्मद अन्वर, हबीबबाबा कादरी, ग्रा.पं. सदस्य अय्युब कुरेशी, तंटामुक्ती अध्यक्ष जमनाप्रसाद तिवारी, माजी उपसरपंच मोहम्मद असलम अंजुम, सैयद समदान, सैयद रफिक, अब्दुल मन्नान कादरी, अखतर पठाण, हाजी सैयद जाकीर, मोहम्मद फयाज, ग्रा.पं.सदस्य सादीकशाह, हबीबशाह आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन हजरत हाफीज व मोहम्मद असलम रिज्वी यांनी केले. हजरत मौलाना शफीरुल कादरी यांनी समारंभाच्या आयोजनामागची भूमिका प्रास्ताविकातून व्यक्त केली. उपस्थितांचे आभार साखरखेर्डा शिक्षण समितीचे अध्यक्ष दाऊद कुरेशी यांनी मानले.
गरीब नवाज यांनी मानव कल्याणाचे विचार पेरले!
By admin | Updated: April 23, 2017 01:01 IST