शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सिंदखेडराजा : खरेदीअभावी शेतक-यांची तूर घरातच पडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:47 IST

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथील खरेदी-विक्री संघाने २६ एप्रिलपर्यंत फक्त २५ टक्के शेतकºयांची तूर खरेदी केली असून, ७५ टक्के शेतकºयांची तूर घरातच पडून आहे. कासवगतीने तुरीची खरेदी होत असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

ठळक मुद्दे२६ एप्रिलपर्यंत फक्त १० हजार ७०० क्विंटल खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथील खरेदी-विक्री संघाने २६ एप्रिलपर्यंत फक्त २५ टक्के शेतकºयांची तूर खरेदी केली असून, ७५ टक्के शेतकºयांची तूर घरातच पडून आहे. कासवगतीने तुरीची खरेदी होत असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीचा पेरा करीत असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकºयाला ४ ते ५ क्विंटल तुरीचे उत्पादन शेतकºयांना होते. तुरीचे पीक हक्काचे समजून आणि भाव चांगला मिळतो, या भोळ्यापणामुळे शेतकरी तूर पेरतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बाजारपेठेत तुरीचे भाव पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तुरीला खरेदीदार मिळत नसल्याने शासनाने तुरीचे हमीभाव ठरवून तूर खरेदी केंद्र प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरू केले. ही जबाबदारी खरेदी-विक्री संघाकडे देऊन प्रत्येक शेतकºयाला तूर विक्रीसाठी आॅनलाइन नाव नोंदणीसाठी बँक खाते नंबर, आधार कार्ड, सात-बारा, पेरेपत्रक इ. कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगितले. तालुक्यातील ४ हजार शेतकºयांनी दोन महिन्यांपूर्वी अर्ज नाव नोंदणीकरिता दिले. त्यापैकी केवळ ८३१ शेतकºयांची नावाची नोंद होऊन १० हजार ७३७ क्विंटल ९७ किलो तुरीची खरेदी २६ एप्रिलपर्यंत तुरीची खरेदी झाली आहे. ४ हजार शेतकºयांनी नाव नोंदणीसाठी अर्ज करूनही केवळ ८३१ शेतकºयांची तूर मोजणी झाली. आज प्रत्यक्षात ३१६९ शेतकºयांची खरेदी बाकी आहे. एकूण ४० हजार क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट असून, शेतकºयांच्या घरात २९ हजार २६३ क्विंटल तूर बाकी आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिली; परंतु सिंदखेडराजा खरेदी-विक्री केंद्रावर कासव गतीने खरेदी सुरू असल्याने नाव नोंदणीसाठी अर्ज करूनही ७५ टक्के शेतकºयांना कोणताही मॅसेज प्राप्त झाला नाही. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ सुरू असून, अर्थपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय तूर खरेदी होत नाही, असा आरोप अनेक शेतकºयांनी केला. तुरीचे माप व्हावे म्हणून अनेक वेळा शेतकºयांनी आंदोलने केली. आरोप-प्रत्यारोप झाले; परंतु प्रशासकीय यंत्रणा किती धिम्या गतीने काम करते, याचा प्रत्यय शेतकºयांना आला आहे. शेतकरी हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, धर्माचा, पंथाचा नसून, तो या देशाचा अन्नदाता आहे, याचे भान ठेवून राजकीय नेत्यांनी तुरीची खरेदी वेगाने कशी होईल, याचे भान ठेवून ७५ टक्के शेतकºयांना न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा त्यांची आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा