शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

खामगाव व परिसरात उपहारगृहांमध्ये दूषित पाणी, आरोग्य धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 14:55 IST

 खामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रासपणे अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे.

 खामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रासपणे अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. जलजन्य आजाराची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जलशुध्दी उपकरण लावणे आवश्यक असताना अनेक उपहारगृहामध्ये ते बंदावस्थेत असल्याचे चित्र आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून तपासणी करणे गरजेचे आहे. 

शहरातील विहिरीतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले असतानाही पाण्याचा व्यावसायिक वापर करतात. हेच पाणी हॉटेल व्यावसायिकही वापरतात. शहरात एखाद्या ठिकाणी पाण्याची बोंब असेल त्यावेळी विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. हॉटेलमधील चवीचे खाद्यपदार्थ, चहा आदी बनविण्याकरिता याच पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. शिवाय नागरिकांना हेच पाणी पिण्यास दिले जाते. अनेकदा या पाण्यात जंतु, चामढोके आढळून येतात. या हॉटेलमध्ये बनणारे पदार्थ हे चमचमित आणि तेलकट असतात. यामुळे ते खाल्ल्यावर प्रत्येकालाच भरपूर पाणी प्यावे लागते.  त्यामुळे अशा नागरिकांचे आरोग्य अधिकच धोक्यात येत आहे. काही उपाहारगृहात विहिरीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु सदर विहिरीचे पाणी निजंर्तुकीकरणाअभावी अशुध्द असते. पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगूनही ते पाणी पिण्यास वापरले जाते. 

तालुक्यातील उपहारगृहांची परिस्थिती गंभीर!

तालुक्यातील उपाहारगृहात हीच परिस्थिती आहे. उच्च प्रतिच्या हॉटेलमध्ये शुध्द पाण्याची बाटली विकली जाते.  शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही हॉटेलमध्ये शुद्ध पाणी असतेच असे नाही. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी विकत घेऊन पाणी प्यावे यासाठी म्हणून असे पाणी वापरले जात असल्याचेही वास्तव आहे. 

 पाणी तपासणी मोहिमेला खो!

जुन्या गोल टाक्यांमध्ये, रांजणात पाणी साठवले जाते. यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आरोग्याला धोका असतो. यातूनच जलजन्य, साथीच्या आजाराला सुरुवात होऊन काही जीव गमावण्याची वेळ आली आहे. यासाठी ग्रामपंचायती, नगरपरिषद प्रशासनांनी पिण्याचे पाणी तपासणी मोहीम सुरूकरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी) 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव