शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेच्या ‘पीएमसी’चे काम अर्ध्यावर सोडता येणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 15:11 IST

पाणी पुरवठा योजनेचे काम अर्ध्यावर सोडता येणार नसल्याचे खामगाव नगर पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला स्पष्ट केले आहे.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करण्यास महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने असहमती दर्शविली आहे. यासंदर्भात पालिकेशी पत्रव्यवहारही मजीप्राकडून करण्यात आला आहे. मात्र, खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अर्ध्यावर सोडता येणार नसल्याचे खामगाव नगर पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला स्पष्ट केले आहे. पत्रव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि पालिकेत जुंपल्याचे दिसून येते.युआयडीएसएसएमटी योजनेतंर्गत खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणची शासनस्तरावरून नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने खामगाव नगर पालिकेशी २९ मार्च २०१७ रोजी करारनामा देखील केला आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करण्यासाठी ५६ लक्ष २५ हजार रुपयांचा भरणा नगर पालिकेकडून २५ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आला. दरम्यान, आता खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने नकार दर्शविला आहे. त्यामुळे पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामध्ये चांगलीच जुंपली आहे.खामगाव शहरासाठी महत्वाकांक्षी असलेली वाढीव पाणी पुरवठा योजना रखडल्याने तसेच योजनेचे काम अपूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या ‘पीएमएसी’चे काम सोडता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.मजीप्रा आणि पालिकेमध्ये बैठकांचे सत्र !मजीप्राने ‘पीएमसी’म्हणून काम करण्यास नकार देत, पत्रव्यवहार केल्यानंतर पालिकेनेही महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाशी पत्रव्यवहार चालविला आहे. तसेच वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम विहित मुदतीत वाढीस लागावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि नगर पालिकेमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे दिसून येते.

योजनेची अनेक कामे अर्धवट!खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेची सद्यस्थितीत उर्ध्ववाहिनी, जॅकवेल आणि पंपहाऊसचे काम, गुरूत्ववाहिनी आणि विद्युत जोडणीची काही कामे अपूर्ण आहेत. वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करण्याबाबत शासनस्तरावरनू निर्देशीत केले आहे. मात्र, आता महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या भूमिकेमुळे वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामामध्ये आणखी तिढा निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा