शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

स्वातंत्र्य सैनिक स्मृतिस्थळांची दुर्दशा

By admin | Updated: November 9, 2014 23:18 IST

मलकापूर येथील स्वांतत्र्य सैनिकांचे स्मृतिस्थळ आले मोडकळीस.

हनुमान जगताप / मलकापूरज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले, वेळप्रसंगी प्राणाची बाजी लावली, अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींची मलकापूर शहरात अक्षरश: थट्टा सुरू असल्याचे भयावह चित्र आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती चिरकाल कायम राहाव्या, यासाठी शासनाने स्मारके उभारली असली तरी लालफीतशाहीत प्रशासनाचेच त्याकडे दुर्लक्ष असल्याने आमच्या पूर्वजांनी बलिदान करून पाप केलं की काय, अशी भावना स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांमध्ये व्यक्त होत आहे.यासंदर्भात माहिती अशी की, इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी देशातील कोट्यवधी व्यक्ती पुढे आल्या. वेळप्रसंगी स्वत:च्या प्राणांची आहुती त्यांनी दिली. त्याच बलिदानापोटी देश स्वातंत्र्य झाला अन् आजची पिढी स्वा तंत्र्यात जगत आहे. त्या लढय़ात ज्यांनी बलिदान दिले, त्यांचा आदर्श युवा िपढीसमोर राहावा, यासाठी शासनाने स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके देशभरात उभारली आहेत. त्याच धर्तीवर विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरातही स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके, एक नव्हे तीन ठिकाणी, उभारण्यात आली आहेत. त्यात तहसील चौकातील हुतात्मा पुंडलिक मराठा स्मारक, लायब्ररी मैदानातील जयस्तंभ स्मारक व गांधी चौकातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मृती स्मारक अशा तीन स्मारकांचा समावेश आहे.एकेकाळी तरुणाईने स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींचा आदर्श घ्यावा, अशी भावना शासनाची होती. आता मात्र त्या स्मारकांची पार वाट लागलीय. स्मारकाभोवती घाणीचे साम्राज्य, सभोवताली जनावरांचा मुक्त संचार यांखेरीज मटका, जुगार यासाठी स्मारकांचा सर्रास वापर होत आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके शोभेची वस्तू नव्हे. तथापि, एक प्रकारे त्यांची थट्टा सुरू असल्याचे चित्र येथे आहे.