शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

नुकसानग्रस्त भागात धान्य पुरवठ्याचे केले नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:02 IST

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूनही नुकसानग्रस्त भागातील शेतकºयांसाठी धान्याचे वितरण करण्याचे नियोजन केलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अति पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागात अन्नधान्याचा तुटवडा पडू नये, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने योग्य ती तडजोड केलेली आहे. धान्य वितरणासाठी पुरवठा विभागाने पुर्वतयारी केली असून शासनाच्या सुचना आल्यास धान्याचे वितरण होऊ शकते.जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मि.मी. पाऊस पडतो. मात्र गेल्या दोन महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात अति पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मेहकर, देऊळगाव माळी, बिबी, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, शेंदुर्जन, सोनुशी, चांधई या आठ मंडळामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी हालेला शेतमाल हिरावल्या गेला. सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी या पिकांसह भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार या तालुक्यातील २१ गुरांवर अति पावसाने मृत्यूचे संकट ओढावले. तर जिल्ह्यातील ११ घरांची पडझड यामध्ये झालेली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची व्याप्ती बघता कृषी व महसूल विभागाकडून तातडीने सर्वे करण्याला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूनही नुकसानग्रस्त भागातील शेतकºयांसाठी धान्याचे वितरण करण्याचे नियोजन केलेले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दिले जाणारे धान्य शेतकºयांना वेळेवर मिळावे, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. नुकसान झालेल्या भागात धान्याची टंचाई होणार नाही, यासाठी तहसीलस्तरावरून धान्याचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नुकसानग्रस्त भागातील सर्वांनाच मिळणार का लाभ?पावसाचा फटका शेतकºयांसोबत शेतमजुरांनाही बसला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार १७ शेतकºयांना गहू २ रुपये किलो व तांदूळ ३ रुपये किलो प्रमाणे वितरीत केल्या जातो. परंतू आता नुकसानग्रस्त भागातील सार्वांनाचा याचा लाभ मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नुकसानग्रस्त भागामध्ये धान्याचा तुटवडा पडू नाही, यासाठी योग्य ते नियोजन केलेले आहे. सर्वे दरम्यान कुठेही धान्याची आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी तातडीने धान्याची व्यवस्था होईल, याची काळजी घेतली आहे. तहसील स्तरावर आवश्यकतेनुसार धान्याचा साठा ठेवण्यात आलेला आहे.- गणेश बेल्लाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा