शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नदीपात्रातील शेतरस्त्यात खोदले खड्डे; शेतकरी झाले त्रस्त

By विवेक चांदुरकर | Updated: March 22, 2024 18:36 IST

नदीपात्रातून जात असलेल्या रस्त्यावर खड्डे करून रेतीचे उत्खनन करण्यात येत आहे

बावनबीर : संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर मंडळांतर्गत अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांनी नदीपात्रात असलेल्या शेतरस्त्यांमध्येच खड्डे खोदले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच अवैध रेतीची वाहतूक करणारी वाहने शेतातून जात असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.

बावनबीर मंडळातील भाऊ मंदिर शिवारातील केदार नदी, पंचाळा शिवारातील लेंडी नदी, पडसोडा शिवारातील कचेरी नदी तसेच शेत शिवारातून वाहणाऱ्या नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर रेती चोरी केली जात आहे. शासनाचे लाखो रुपयांचे गौण खनिजाची चोरी करण्यात येत आहे. गौण खनिजाची वाहतूक करणारे टिप्पर व ट्रक शेतातील रस्त्यांतून जातात. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. तसेच रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्याकरिता असलेला रस्त्यात मोठमोठे खड्डे करण्यात आले आहेत.

नदीपात्रातून जात असलेल्या रस्त्यावर खड्डे करून रेतीचे उत्खनन करण्यात येत आहे. याबाबत संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचाळा शिवारातील लेंडी नदी, बावनबीर शिवारातील केदार नदी व परसोळा शिवारातील कचेरी नदीची प्रत्यक्ष पाहणी करून चोरी गेलेल्या गौण खनिज चोरीची पाहणी करून दोषींवर कारवाइ करण्याची मागणी होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे शेतमार्ग तत्काळ दुरुस्त करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बावनबीर मंडळांतर्गत मोठ्या प्रमाणावर गौण खनिज चोरी जात आहे. चोरटे शेत रस्त्याचे नुकसान करीत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी.- शेख मोहसीन, शेतकरी बावनबीर