शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

पेनटाकळी कालवा, भुसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 11:13 IST

Buldhana News : पांढरदेव, घानमोड, मानमोड या गावांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पेनटाकाळी प्रकल्पाचा कालवा गेल्या वर्षी फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अद्यापही हा प्रश्न प्रशासकीय पातळीवर गांभिर्याने घेतल्या गेलेला नाही. यासोबतच पांढरदेव, घानमोड, मानमोड या गावांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न कायम आहे. प्रकल्पाच्या ४१६ कोटी ५९ लाख रुपयांची सुप्रमा मंजूर झालेली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत.गेल्या दोन दिवसापुर्वी खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थिततीत या प्रकल्पाशी संबंधित अडचणी, कालव्याचे प्रश्न, भुसंपादनाचे प्रश्न आणि तीन गावांच्या पुनर्वसनासंदर्भात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे किमानपक्षी हा विषय प्रशासनाच्या लिस्टवर आलेला आहे.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पेनटाकळी प्रकल्पातंर्गत दुधा शिवारातील मुख्य कालव्याला भगदाड पडून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून नुकसान झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यासोबतच प्रकल्पावरील १४ किमीच्या मुख्य कालव्यातून पाणी झिरपून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान फुटलेला हा कालवा दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनाही त्यावेळी शेतकऱ्यांनी अटकाव केला होता.पेनटाकळी प्रकल्पाद्वारे जवळपास १४ हजार २३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. प्रकल्प पूर्णत्वास केला असला तरी कालव्यांची काही भुसंपादनाची प्रकरणे, तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत आहे. या मुद्द्यावर प्रामुख्याने बैठकीत चर्चा करण्यात येऊन या प्रश्नी त्वरेने मार्ग काढण्यासंदर्भात हालचाली करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

बाधितांनाही नुकसान भरपाईची प्रतीक्षागेल्यावर्षी कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यामध्ये पाच शेतकऱ्यांचे नुकसान मोठे होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. दाेन दिवसापुर्वी झालेल्या बैठकीत या विषयावर प्राधान्याने चर्चा करण्यात आली हाेती.कालव्याची दुरुस्ती गरजेचीपेनटाकळी प्रकल्पावरील मुख्य कालव्याची क्षमता ही ८.१८ क्युसेक आहे. पण गेल्या वर्षी २.७ क्युसेक एवढाच पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतरही कालव्याला भगडाद पडले होते. त्यामुळे प्राधान्य क्रमाने हा कालवा दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प