शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

Ayodhya Verdict : 'अयोध्या' निकालाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 18:17 IST

सकाळी निकाल जाहीर होताच नागरिकांनी निकालाचे स्वागत केले असून शांतता कायम आहे.

बुलडाणा : अयोध्दा निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. कुठेही अनुचित प्रकार घडला नसून सर्वत्र शांतता दिसून आली. जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ स्वत: परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शनिवारी बहुचर्चित अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर केला. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठलाही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.  पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात दोन अपर पोलिस अधीक्षकांनी विविध ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीची  पाहणी केली. सकाळी निकाल जाहीर होताच नागरिकांनी निकालाचे स्वागत केले असून शांतता कायम आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकाºयांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत. बंदोबस्तासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. .

कडेकोट बंदोबस्त तैनात

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे.  १ एसआरपीएफ प्लाटून, ५ आरपीसी प्लाटून, १ क्यूआरटी प्लाटून, १ हजार ३०० होमगार्ड, ३१ स्ट्रायकिंग फोर्स, एलसीबी, डीएसबी यांच्यासह पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. कुठल्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी शांतता बाळगावी असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

संवेदनशिल ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त

जिल्ह्यातील संवेदनशिल ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चिखली, धाड, खामगाव, मलकापूर येथे डीवायएसपी दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी जिल्ह्यात २१ शांतता समितीच्या बैठका घेऊन त्यामाध्यमातून नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याPoliceपोलिस