शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

पटोले-तुपकर यांच्यात बंदद्वार चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 02:01 IST

चिखली : स्वपक्षाच्या सरकारवरील धोरणावर टीकेची झोड उठवून सध्या चर्चेत असलेले भाजपाचे खासदार नाना पटोले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देचिखली येथे भेट सोयाबीन, कापूस व धानाच्या प्रश्नासाठी लवकरच मोठे आंदोलन

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्वपक्षाच्या सरकारवरील धोरणावर टीकेची झोड उठवून सध्या चर्चेत असलेले भाजपाचे खासदार नाना पटोले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. जवळपास एक तास झालेल्या उभय नेत्यांमधील बंदद्वार चर्चेत लवकरच सोयाबीन, कापूस व धान उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन उभे करण्यासाठी व्यूहरचना झाल्याचे समजते.  पूर्व विदर्भात खा. पटोले हे धान उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. तर पश्‍चिम विदर्भात सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढणारा नेता अशी रविकांत तुपकर यांची ओळख आहे. औद्योगिक परिसरात आयोजित एका कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांनी बंदद्वार चर्चा केली. या भेटीत शेतकर्‍यांच्या अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती असून, लवकरच दोन्ही नेते विदर्भात सरकारविरोधात रण माजविण्याचे संकेत या बंदद्वार बैठकीतून मिळत आहेत. कोल्हापूर येथे खा. पटोले यांनी खा. राजू शेट्टी यांच्या २0 नोव्हेंबरला होणार्‍या मोर्चात सहभागी होण्याचे म्हटले होते. त्या पृष्ठभूमीवर ही बैठक महत्त्वाची समजली जाते.कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होती.

राजकीय भूकंपाची शक्यताभाजपवर नाराज असलेले खा. नाना पटोले सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्यामुळे  ते चांगलेच चर्चेत आले आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लाल दिव्याला लाथाडून आपल्या पदाचा राजीनामा देणारे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी नुकताच संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला आहे. दरम्यान, हे दोन्ही आक्रमक शेतकरी नेते एकत्र आल्यास विदर्भातील राजकारणास कलाटणी मिळेल, असेही बोलले जाते. 

सरकारवर टीकेची झोडखा. पटोले व तुपकर या कार्यक्रमानिमित्त प्रथमच एकत्र आले. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी सोयाबीन, कापूस व धान उत्पादक शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशोधडीला लागल्याचा आरोप केला. नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय घेऊन शेतकरी, सामान्य जनतेचे जगणे मुश्कील केल्याची टीकाही त्यांनी केली. - 

टॅग्स :Politicsराजकारण