शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

पॅसेंजर बंद : जिल्ह्यातील पाच रेल्वेस्थानकांवर अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:13 IST

बुलडाणा : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली, तरी अजूनही लेकुरवाळ्या समजल्या जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. जनसामान्यांसाठी सोयिस्कर ...

बुलडाणा : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली, तरी अजूनही लेकुरवाळ्या समजल्या जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. जनसामान्यांसाठी सोयिस्कर असलेल्या या गाड्या बंद असल्यामुळे जिल्ह्यातील पाच छोटी रेल्वेस्थानके बंदच आहेत. कोणीही प्रवासी फिरकत नसल्यामुळे एकेकाळी गजबजून राहणाऱ्या या स्टेशनला अवकळा आली आहे.

मध्य रेल्वेचा मुंबई ते कोलकाता हा महत्त्वपूर्ण लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. या लोहमार्गावर शेगाव, नांदुरा व मलकापूर या तीन मोठ्या स्थानकांसह जलंब, चांदूरबिस्वा ही छोटी स्थानके आहेत. तर खामगाव हेदेखील छोटे स्थानक असून येथे जाण्यासाठी जलंब येथून स्वतंत्र मार्ग आहे. कोरोनापूर्वी पॅसेंजर गाड्या सुरू होत्या, तेव्हा या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असायची. कोरोना काळात जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद असल्याने या स्थानकांवर आता कोणत्याही गाड्या थांबत नाहीत. छोट्या स्थानकांवर केवळ पॅसेंजर गाड्यांना थांबा आहे. मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट गाड्या या छोट्या रेल्वेस्थानकांवरून निघून जातात. पॅसेंजर गाड्या नसल्याने या रेल्वेस्थानकांवर आता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही दिसून येत नाही. एकेकाळी प्रवाशांचा राबता असलेली ही छोटी रेल्वेस्थानके ओस पडली आहेत. पॅसेंजर गाड्या सुरू करून जनसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या

५११८३ भुसावळ-नरखेड

५११९८ वर्धा-भुसावळ

५१२८६ नागपूर-भुसावळ

५७५८१ अकोला-पूर्णा

५७५३९ अकोला-परळी

अकोला-पूर्णा डेमू गाडी सुरू

दक्षिण-मध्य रेल्वेने अकोला ते पूर्णापर्यंत डेमू गाडी सुरू केली आहे. ही गाडी छोट्या स्थानकांवरही थांबते; परंतु या गाडीचे तिकीट जास्त आहे. या लोहमार्गावर पूर्वी अकोला-पूर्णा व अकोला-परळी या पॅसेंजर गाड्या धावत होत्या.

एक्स्प्रेस सुरू, मग पॅसेंजर बंद का?

कोरोनाकाळात सर्व गाड्या बंद होत्या. आता एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून कोरोना पसरत नाही. केवळ पॅसेंजर गाड्यांमधूनच कोरोना पसरतो का, एक्स्प्रेस गाड्या धावू शकतात, तर पॅसेंजर गाड्याही सुरू व्हायलाच हव्या.

-मंगला घोपे, जलंब

भुसावळ किंवा बडनेरा, वर्धाकडे जाण्यासाठी पॅसेंजर गाड्या सोयिस्कर होत्या. कमी तिकिटात प्रवास करता येत होता. आता एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जादा तिकीट मोजावे लागत आहे. शासनाने पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजे.

-उमाकांत कांडेकर, जलंब.

बंद असलेली रेल्वे स्थानके

नागझरी, जलंब, खुमगाव बुट्टी, चांदूर बिस्वा, खामगाव