शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खामगावातील पळशी गावाने मिळविला होता राज्यातील पहिलाच पुरस्कार

By admin | Updated: February 17, 2015 01:27 IST

स्मृती उजाळा; आबांच्या संकल्पनेतील ग्रामस्वच्छतेला बुलडाणा जिल्ह्याची साथ.

बुलडाणा : एक संवेदनशील व विधायक वृत्तीचा नेता म्हणून उभ्या महाराष्ट्रात आर.आर.पाटील यांची ओळख निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाने केले. ग्रामविकाससारख्या उपेक्षित खात्याला नवे रूप देतानाच गावोगाव स्वच्छतेचा मंत्र पसरवून लोकचळवळ निर्माण करण्याचे काम त्यांनी केल्यामुळे त्यांचा आदराने ह्यमहाराष्ट्राचे आधुनिक गाडगेबाबाह्ण असा उल्लेख केला जायचा. या चळवळीला बुलडाणा जिल्ह्याने भरभरून साथ दिली. सन २000-२00१ या वर्षात या योजनेतील राज्यातील पहिलाच पुरस्कार खामगावातील पळशी गावाने पटकावून आबांच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखीत केले होते. सोमवारी आर.आर.आबा यांचे निधन झाल्यानंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. ग्रामस्वच्छता अभियान या योजनेने महाराष्ट्रात नव्या लोकचळवळीचे बीजारोपण केले. गावोगाव स्वच्छतेचा जागर सुरू झाला. याचे सारे ङ्म्रेय आर.आर.आबा यांना जाते. पळशी हे गाव राज्यात चमकल्यावर दुसर्‍याच वर्षी वकाणा या गावाने राज्यात बाजी मारली. त्यानंतर सुरू झालेली ही स्वच्छतेची चळवळ आजतागायत सुरूच आहे. सामाजिक क्षेत्रात मोठी क्रांती घडविणार्‍या आर.आर.आबांचा बुलडाण्याशी अनेक अर्थांनी ऋणानुबंध राहिला आहे. माजी आरोग्य मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. ह्यडॉक्टरह्ण या नावांनी अनेकदा जाहीर भाषणातूनही त्यांनी ते व्यक्त केले होते.