शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

स्वस्त धान्य दुकान तपासणीचा अहवाल सादर करण्याचा आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:50 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या ६६ हजार ४९६ असून, त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात गहू १३ हजार ९६0 व तांदूळ ९ हजार ३१0 क्विंटल पुरवठा करण्यात आला  आहे; मात्र जिल्ह्यात राशनचा माल काळा बाजारात विक्री होण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक लाभार्थ्यांना या धान्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात अंत्योदयचे ६६ हजार लाभार्थी राशनची काळा बाजारात विक्री वाढली!

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या ६६ हजार ४९६ असून, त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात गहू १३ हजार ९६0 व तांदूळ ९ हजार ३१0 क्विंटल पुरवठा करण्यात आला  आहे; मात्र जिल्ह्यात राशनचा माल काळा बाजारात विक्री होण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक लाभार्थ्यांना या धान्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.जिल्ह्यात शासकीय अन्न धान्याचा काळाबाजार वाढत असल्याने गोरगरिबांना राशनच्या मालापासून वंचित रहावे लागत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २0१३ अंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांसाठी दरमहा हजारो क्विंटल धान्याचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात येतो. जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या ६६ हजार ४९६ आहे.  अंत्योदय लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याचे  धान्य गहू व तांदूळ धान्याची शासकीय गोदामात  वाहतूक करण्याचे आदेश या महिन्याच्या सुरूवातीलाच देण्यात आले होते.  त्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन लॉजिस्टीक्स प्रा. लि. खामगाव यांच्या  गोदामातून १५ सप्टेंबरपर्यंत या धान्याची उचल करण्यात आली. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यासाठी गहू १ हजार ६६७ क्विंटल व तांदूळ ९00 क्विंटल,  चिखली गहू ५५६ क्विंटल व तांदूळ ९00 क्विंटल, अमडापूर गहू ३३८ क्विंटल व तांदूळ १00 क्विंटल,  देऊळगाव राजा गहू ७00 व तांदूळ ७00,  मेहकर गहू ७७६ व तांदूळ १ हजार क्विंटल, डोणगाव गहू ३३८ व तांदूळ १00 क्विंटल, लोणार गहू १ हजार ६७८ व तांदूळ १ हजार २00 क्विंटल,  सिंदखेड राजा गहू ७७२ व तांदूळ ८00, साखरखेर्डा गहू ६१४ व तांदूळ २५0 क्विंटल, मलकापूर गहू १ हजार ११७ व तांदूळ ५00 क्विंटल, मोताळा गहू १ हजार ४१४  व तांदूळ ६00 क्विंटल, नांदूरा गहू १ हजार १४८  व तांदूळ ६00 क्विंटल, खामगाव गहू १ हजार २0४ व तांदूळ ३५0 क्विंटल, शेगाव गहू ५६३  व तांदूळ २५0 क्विंटल, जळगाव जामोद गहू ३४१ व तांदूळ ४५0 क्विंटल, संग्रामपूर गहू ७३८ व तांदूळ ६१0 क्विंटल  पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांसाठी एकूण गहू १३ हजार ९६0 व तांदूळ ९ हजार ३१0 क्विंटल पुरवठा करण्यात आला आहे. धान्याचा वाढता काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केल्यानंतर तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी दिले आहेत.    

मध्येच गायब होणार्‍या मालाची चौकशी गरजेची शासकीय धान्य गोदामातून उचल करण्यात आलेले धान्य मध्येच गायब होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. ज्या ठिकाणी धान्याचा काळाबाजार उघड झाला, त्याची थातुरमातूर चौकशी करून पुन्हा प्रकरण फाइलबंद होते; मात्र त्यानंतर पुन्हा पुढच्या महिन्यात शासकीय गोदामातून उचल झालेले धान्य स्वस्त धान्य दुकानांपर्यंत जाण्याआधीच कमी होते. त्यामुळे मध्येच गायब होणार्‍या मालाची चौकशी लावणे गरजेचे आहे.