शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुख्यमंत्र्यांनी दिले बोगस दिव्यांगांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: June 24, 2017 05:36 IST

लोकमतच्या वृत्ताचे कात्रण जोडून जिल्हय़ात सर्रास होत असलेला गैरप्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हय़ात अनेक बनावट प्रमाणपत्र घेतलेले दिव्यांग कर्मचारी असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाटत आहेत. या कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद सीईओंना दिले आहेत.जिल्हय़ात अनेक कर्मचार्‍यांनी दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र घेतले आहे. दिव्यांग कर्मचार्‍यांसाठी असलेल्या योजनांचा हे कर्मचारी लाभ घेत असल्याचे बिंग लोकमतने फोडले. त्यानंतर काही शिक्षक संघटनांनी या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. लोकमतच्या वृत्ताचे कात्रण जोडून जिल्हय़ात सर्रास होत असलेला गैरप्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा परिषद सीईओंनी या प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. तसेच जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्‍यांनाही तसे पत्र दिले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांनी चौकशी समिती नेमली आहे; मात्र एक महिना झाल्यानंतरही या समिती कोणती चौकशी केली, हे गुलदस्त्यात आहे. जिल्हा परिषदेने शिक्षकांकडून यानंतर दिव्यांगत्वाचा लाभ घेणार नाही, असे लिहून घेतले आहे; मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतरही कारवाई करण्यात येईल काय, की मुख्यमंत्र्यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखविण्यात येईल, याकडे सर्वांंंचे लक्ष लागून आहे.