शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या प्रतिक्षेत; मृग बहाराचे नुकसान

By विवेक चांदुरकर | Updated: December 25, 2023 15:06 IST

४८०० रुपये भरून काढला विमा, जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

खामगाव : निसर्गाच्या अवकृपेने जिल्ह्यात संत्रा पिकाच्या मृग बहार फुटीवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ४८०० रुपये भरून विमा काढला आहे. अटी व नियमानुसार मृग बहाराचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना विमा मिळायला हवा; मात्र अद्याप विमा मिळाला नसून शेतकरी विम्याच्या प्रतिक्षेत आहेत.

जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. संग्रामपूर तालुक्यात सोनाळा परिसरात शेकडो हेक्टरवर संत्रा बागांची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून संत्रा बागा उभ्या केल्या आहेत. झाडांचे संगोपन करण्याकरिता दरवर्षी हजारो रुपये खर्च करावे लागतात. विमा मिळण्याकरिता नियमानुसार १५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्यास ४० हजार रुपये देय राहते. १२४ ते १५० मिमी पाऊस झाल्यास १२ हजार रुपये देय राहते. सोनाळा व बावनबीर परिसरात पाऊस कमी पडला व खंडही पडला असल्याने विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मृग बहाराकरिता शेतकऱ्यांनी ४८०० रुपये भरून विमा काढला असून प्रतिहेक्टर ८० हजार रुपये संरक्षित रक्कम आहे. हा विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी विम्याच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपनीने त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विम्याचे हे आहेत नियमनियमानुसार १५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्यास ४० हजार रुपये देय राहते. १२४ ते १५० मिमी पाऊस झाल्यास १२ हजार रुपये देय राहते. तसेच १६ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान १५ ते २१ दिवस पावसाचा खंड पडला आणि यादरम्यान तीन दिवस तापमान ३५ डिग्रीपेक्षा असले तर १८ हजार रूपये भरपाई देय राहते. तसेच २१ दिवसांपेक्षा पावसाचा खंड पडल्यास व सलग तीन दिवस तापमान ३५ डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ४० हजार रुपये भरपाई देय राहील.

मृग बहाराचा विमा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार विमा शेतकऱ्यांना देण्यात येईल. - नितीन सावळेजिल्हा प्रतिनिधी, एआयसी विमा कंपनी

संत्रा उत्पादक शेतकरी प्रतिक्षेत

१५ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याकरिता आम्ही ४८०० रुपये भरून विमा काढला. या काळात संत्र्याच्या मृग बहाराचे नुकसान झाले असून, विमा मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. गतवर्षी डिसेंबर महिन्यात विमा मिळाला होता. यावर्षी मात्र अद्याप मिळाला नाही. - तुकाराम इंगळे, संत्रा उत्पादक शेतकरी