शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या प्रतिक्षेत; मृग बहाराचे नुकसान

By विवेक चांदुरकर | Updated: December 25, 2023 15:06 IST

४८०० रुपये भरून काढला विमा, जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

खामगाव : निसर्गाच्या अवकृपेने जिल्ह्यात संत्रा पिकाच्या मृग बहार फुटीवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ४८०० रुपये भरून विमा काढला आहे. अटी व नियमानुसार मृग बहाराचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना विमा मिळायला हवा; मात्र अद्याप विमा मिळाला नसून शेतकरी विम्याच्या प्रतिक्षेत आहेत.

जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. संग्रामपूर तालुक्यात सोनाळा परिसरात शेकडो हेक्टरवर संत्रा बागांची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून संत्रा बागा उभ्या केल्या आहेत. झाडांचे संगोपन करण्याकरिता दरवर्षी हजारो रुपये खर्च करावे लागतात. विमा मिळण्याकरिता नियमानुसार १५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्यास ४० हजार रुपये देय राहते. १२४ ते १५० मिमी पाऊस झाल्यास १२ हजार रुपये देय राहते. सोनाळा व बावनबीर परिसरात पाऊस कमी पडला व खंडही पडला असल्याने विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मृग बहाराकरिता शेतकऱ्यांनी ४८०० रुपये भरून विमा काढला असून प्रतिहेक्टर ८० हजार रुपये संरक्षित रक्कम आहे. हा विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी विम्याच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपनीने त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विम्याचे हे आहेत नियमनियमानुसार १५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्यास ४० हजार रुपये देय राहते. १२४ ते १५० मिमी पाऊस झाल्यास १२ हजार रुपये देय राहते. तसेच १६ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान १५ ते २१ दिवस पावसाचा खंड पडला आणि यादरम्यान तीन दिवस तापमान ३५ डिग्रीपेक्षा असले तर १८ हजार रूपये भरपाई देय राहते. तसेच २१ दिवसांपेक्षा पावसाचा खंड पडल्यास व सलग तीन दिवस तापमान ३५ डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ४० हजार रुपये भरपाई देय राहील.

मृग बहाराचा विमा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार विमा शेतकऱ्यांना देण्यात येईल. - नितीन सावळेजिल्हा प्रतिनिधी, एआयसी विमा कंपनी

संत्रा उत्पादक शेतकरी प्रतिक्षेत

१५ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याकरिता आम्ही ४८०० रुपये भरून विमा काढला. या काळात संत्र्याच्या मृग बहाराचे नुकसान झाले असून, विमा मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. गतवर्षी डिसेंबर महिन्यात विमा मिळाला होता. यावर्षी मात्र अद्याप मिळाला नाही. - तुकाराम इंगळे, संत्रा उत्पादक शेतकरी