शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या प्रतिक्षेत; मृग बहाराचे नुकसान

By विवेक चांदुरकर | Updated: December 25, 2023 15:06 IST

४८०० रुपये भरून काढला विमा, जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

खामगाव : निसर्गाच्या अवकृपेने जिल्ह्यात संत्रा पिकाच्या मृग बहार फुटीवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ४८०० रुपये भरून विमा काढला आहे. अटी व नियमानुसार मृग बहाराचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना विमा मिळायला हवा; मात्र अद्याप विमा मिळाला नसून शेतकरी विम्याच्या प्रतिक्षेत आहेत.

जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. संग्रामपूर तालुक्यात सोनाळा परिसरात शेकडो हेक्टरवर संत्रा बागांची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून संत्रा बागा उभ्या केल्या आहेत. झाडांचे संगोपन करण्याकरिता दरवर्षी हजारो रुपये खर्च करावे लागतात. विमा मिळण्याकरिता नियमानुसार १५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्यास ४० हजार रुपये देय राहते. १२४ ते १५० मिमी पाऊस झाल्यास १२ हजार रुपये देय राहते. सोनाळा व बावनबीर परिसरात पाऊस कमी पडला व खंडही पडला असल्याने विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मृग बहाराकरिता शेतकऱ्यांनी ४८०० रुपये भरून विमा काढला असून प्रतिहेक्टर ८० हजार रुपये संरक्षित रक्कम आहे. हा विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी विम्याच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपनीने त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विम्याचे हे आहेत नियमनियमानुसार १५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्यास ४० हजार रुपये देय राहते. १२४ ते १५० मिमी पाऊस झाल्यास १२ हजार रुपये देय राहते. तसेच १६ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान १५ ते २१ दिवस पावसाचा खंड पडला आणि यादरम्यान तीन दिवस तापमान ३५ डिग्रीपेक्षा असले तर १८ हजार रूपये भरपाई देय राहते. तसेच २१ दिवसांपेक्षा पावसाचा खंड पडल्यास व सलग तीन दिवस तापमान ३५ डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ४० हजार रुपये भरपाई देय राहील.

मृग बहाराचा विमा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार विमा शेतकऱ्यांना देण्यात येईल. - नितीन सावळेजिल्हा प्रतिनिधी, एआयसी विमा कंपनी

संत्रा उत्पादक शेतकरी प्रतिक्षेत

१५ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याकरिता आम्ही ४८०० रुपये भरून विमा काढला. या काळात संत्र्याच्या मृग बहाराचे नुकसान झाले असून, विमा मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. गतवर्षी डिसेंबर महिन्यात विमा मिळाला होता. यावर्षी मात्र अद्याप मिळाला नाही. - तुकाराम इंगळे, संत्रा उत्पादक शेतकरी