शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

जाचक अटींमध्ये अडकला संत्रा पीक विम्याचा लाभ

By विवेक चांदुरकर | Updated: August 25, 2023 18:38 IST

जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे.

खामगाव (बुलढाणा) : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येतो. मात्र, विमा मिळण्याकरिता जाचक अटी असल्यामुळे विम्याचा लाभ मिळण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे नुकसान झाल्यावरही शेतकरी विम्यापासून वंचित राहतात.

जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात मृग आणि आंबिया हे दोन बहार घेण्यात येतात. यापैकी मृग बहाराच्या वेळी संत्र्याला जास्त दर मिळतो. तर यावेळी उत्पादनही अधिक होते. शासनाने पीक विम्याबाबत तीन वर्षांपूर्वी अध्यादेश काढला होता. यातील अटींवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच संत्रा उत्पादक समिती स्थापन केली आहे. संत्रा पीक विमा काढण्याकरिता शेतकऱ्यांना ११ हजार ६०० रुपये भरावे लागतात.

अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे, तसेच पावसाचा खंड पडला तर अनेकदा संत्रा पिकाचे नुकसान होते. मात्र, विम्याच्या अटी कठोर असल्याने भरपाइपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते. आंबिया बहारामध्ये १ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान सलग ७ दिवस ३० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर २० हजार रुपये भरपाइ देण्यात येते. मात्र, या कालावधीत २० किंवा २५ मिमी पाऊस झाला तरीही नुकसान होते. मात्र, भरपाइ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विम्याच्या अटीमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली आहे.पीक विमा मिळण्याकरिता शासनाच्या वतीने जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. नुकसान झाल्यावरही भरपाइ मिळत नाही. शेतकरी पीक विमा काढण्याकरिता ११,६०० रुपये भरतात. मात्र त्यांच्या पैशांचेही नुकसान होते. याबाबत न्याय मागण्याकरिता संत्रा उत्पादक समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी न्यायालयातसुद्धा धाव घेतली आहे.- तुकाराम इंगळे, सचिव संत्रा उत्पादक समिती, सोनाळाकाय आहेत निकष

१५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला तर नुकसानभरपाई ४० हजार रुपये देण्यात येते. तसेच या कालावधीत १२४ ते १५० मिमी पाऊस झाला, तर १२ हजार रुपये देण्यात येते. मात्र या कालावधीत १०० किंवा १२० मिमी पाऊस झाला तरी नुकसान होते व निकषानुसार मदत मिळत नाही. १६ जुलै ते १५ ऑगस्ट यादरम्यान पावसाचा १५ ते २१ दिवसांचा खंड पडून तीन दिवस दिवसाचे जास्तीत जास्त तापमान ३५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास १८ हजार रुपये नुकसानभरपाई मिळते. या कालावधीत सतत २१ दिवस खंड पडला आणि तीन दिवस दिवसाचे तापमान ३५ डिग्रीपेक्षा जास्त राहिले, तर ४० हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. मात्र, या कालावधीत जर १० ते १२ दिवसांचा खंड पडला तरीही संत्र्याचे नुकसान होते. दिवसाचे तापमान ३० डिग्री राहले तरी नुकसान होते. मात्र, शासकीय आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणा