शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

जाचक अटींमध्ये अडकला संत्रा पीक विम्याचा लाभ

By विवेक चांदुरकर | Updated: August 25, 2023 18:38 IST

जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे.

खामगाव (बुलढाणा) : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येतो. मात्र, विमा मिळण्याकरिता जाचक अटी असल्यामुळे विम्याचा लाभ मिळण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे नुकसान झाल्यावरही शेतकरी विम्यापासून वंचित राहतात.

जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात मृग आणि आंबिया हे दोन बहार घेण्यात येतात. यापैकी मृग बहाराच्या वेळी संत्र्याला जास्त दर मिळतो. तर यावेळी उत्पादनही अधिक होते. शासनाने पीक विम्याबाबत तीन वर्षांपूर्वी अध्यादेश काढला होता. यातील अटींवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच संत्रा उत्पादक समिती स्थापन केली आहे. संत्रा पीक विमा काढण्याकरिता शेतकऱ्यांना ११ हजार ६०० रुपये भरावे लागतात.

अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे, तसेच पावसाचा खंड पडला तर अनेकदा संत्रा पिकाचे नुकसान होते. मात्र, विम्याच्या अटी कठोर असल्याने भरपाइपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते. आंबिया बहारामध्ये १ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान सलग ७ दिवस ३० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर २० हजार रुपये भरपाइ देण्यात येते. मात्र, या कालावधीत २० किंवा २५ मिमी पाऊस झाला तरीही नुकसान होते. मात्र, भरपाइ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विम्याच्या अटीमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली आहे.पीक विमा मिळण्याकरिता शासनाच्या वतीने जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. नुकसान झाल्यावरही भरपाइ मिळत नाही. शेतकरी पीक विमा काढण्याकरिता ११,६०० रुपये भरतात. मात्र त्यांच्या पैशांचेही नुकसान होते. याबाबत न्याय मागण्याकरिता संत्रा उत्पादक समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी न्यायालयातसुद्धा धाव घेतली आहे.- तुकाराम इंगळे, सचिव संत्रा उत्पादक समिती, सोनाळाकाय आहेत निकष

१५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला तर नुकसानभरपाई ४० हजार रुपये देण्यात येते. तसेच या कालावधीत १२४ ते १५० मिमी पाऊस झाला, तर १२ हजार रुपये देण्यात येते. मात्र या कालावधीत १०० किंवा १२० मिमी पाऊस झाला तरी नुकसान होते व निकषानुसार मदत मिळत नाही. १६ जुलै ते १५ ऑगस्ट यादरम्यान पावसाचा १५ ते २१ दिवसांचा खंड पडून तीन दिवस दिवसाचे जास्तीत जास्त तापमान ३५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास १८ हजार रुपये नुकसानभरपाई मिळते. या कालावधीत सतत २१ दिवस खंड पडला आणि तीन दिवस दिवसाचे तापमान ३५ डिग्रीपेक्षा जास्त राहिले, तर ४० हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. मात्र, या कालावधीत जर १० ते १२ दिवसांचा खंड पडला तरीही संत्र्याचे नुकसान होते. दिवसाचे तापमान ३० डिग्री राहले तरी नुकसान होते. मात्र, शासकीय आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणा