शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जाचक अटींमध्ये अडकला संत्रा पीक विम्याचा लाभ

By विवेक चांदुरकर | Updated: August 25, 2023 18:38 IST

जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे.

खामगाव (बुलढाणा) : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येतो. मात्र, विमा मिळण्याकरिता जाचक अटी असल्यामुळे विम्याचा लाभ मिळण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे नुकसान झाल्यावरही शेतकरी विम्यापासून वंचित राहतात.

जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात मृग आणि आंबिया हे दोन बहार घेण्यात येतात. यापैकी मृग बहाराच्या वेळी संत्र्याला जास्त दर मिळतो. तर यावेळी उत्पादनही अधिक होते. शासनाने पीक विम्याबाबत तीन वर्षांपूर्वी अध्यादेश काढला होता. यातील अटींवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच संत्रा उत्पादक समिती स्थापन केली आहे. संत्रा पीक विमा काढण्याकरिता शेतकऱ्यांना ११ हजार ६०० रुपये भरावे लागतात.

अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे, तसेच पावसाचा खंड पडला तर अनेकदा संत्रा पिकाचे नुकसान होते. मात्र, विम्याच्या अटी कठोर असल्याने भरपाइपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते. आंबिया बहारामध्ये १ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान सलग ७ दिवस ३० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर २० हजार रुपये भरपाइ देण्यात येते. मात्र, या कालावधीत २० किंवा २५ मिमी पाऊस झाला तरीही नुकसान होते. मात्र, भरपाइ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विम्याच्या अटीमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली आहे.पीक विमा मिळण्याकरिता शासनाच्या वतीने जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. नुकसान झाल्यावरही भरपाइ मिळत नाही. शेतकरी पीक विमा काढण्याकरिता ११,६०० रुपये भरतात. मात्र त्यांच्या पैशांचेही नुकसान होते. याबाबत न्याय मागण्याकरिता संत्रा उत्पादक समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी न्यायालयातसुद्धा धाव घेतली आहे.- तुकाराम इंगळे, सचिव संत्रा उत्पादक समिती, सोनाळाकाय आहेत निकष

१५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला तर नुकसानभरपाई ४० हजार रुपये देण्यात येते. तसेच या कालावधीत १२४ ते १५० मिमी पाऊस झाला, तर १२ हजार रुपये देण्यात येते. मात्र या कालावधीत १०० किंवा १२० मिमी पाऊस झाला तरी नुकसान होते व निकषानुसार मदत मिळत नाही. १६ जुलै ते १५ ऑगस्ट यादरम्यान पावसाचा १५ ते २१ दिवसांचा खंड पडून तीन दिवस दिवसाचे जास्तीत जास्त तापमान ३५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास १८ हजार रुपये नुकसानभरपाई मिळते. या कालावधीत सतत २१ दिवस खंड पडला आणि तीन दिवस दिवसाचे तापमान ३५ डिग्रीपेक्षा जास्त राहिले, तर ४० हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. मात्र, या कालावधीत जर १० ते १२ दिवसांचा खंड पडला तरीही संत्र्याचे नुकसान होते. दिवसाचे तापमान ३० डिग्री राहले तरी नुकसान होते. मात्र, शासकीय आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणा