शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

कृषी विधेयकाला विरोध म्हणजे शेतकरी हिताला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST

श्वेता महाले यांचा आराेप : उंद्री येथे शेतकरी मेळावा संपन्न चिखली : नवीन कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेस आणि इतर ...

श्वेता महाले यांचा आराेप : उंद्री येथे शेतकरी मेळावा संपन्न

चिखली : नवीन कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी सुरू केलेला विरोध म्हणजे शेतकरी हिताला विरोध असल्याचे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी केले. भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त उंद्री येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बाेलत हाेत्या.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देशभरातील जवळपास दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकाचवेळी जवळपास १८ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली. या आनुषंगाने पंतप्रधान मोदींचे संबोधन ऐकविण्याचा उंद्री येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, चिखली विधानसभा मतदारसंघातसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी टीव्ही संच लावून पंतप्रधान मोदी यांचे संबोधन हजारो लोकांपर्यंत पोहोचविले. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उंद्री येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात आमदार महाले यांनी कृषी विधेयकाबाबत मार्गदर्शन केले. किमान आधारभूत किंमत व्यवस्था बंद होणार नाही, बाजार समित्या सुरू राहतील, कंत्राटी शेतीमध्ये फक्त पिकांचा करार होणार असल्याने जमिनीबाबत विक्री, भाडेतत्त्व अथवा तारण अशा कुठल्याही प्रकारे जमिनीचे हस्तांतरण होणार नाही, शेती करारात पिकाचा खरेदी भाव अगोदरच नमूद केल्या जाईल, करारात निर्धारित केलेली रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्यास सरकारी कारवाई होऊन दंड आकारला जाईल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही कंपनीशी केलेला व्यवहार शेतकरी कुठलाही दंड न भरता कोणत्याही क्षणी करार रद्द करू शकतो, असे असतानाही शेतकऱ्यांची दिशाभूल करीत विरोधकांना थेट शेतकऱ्यांच्या हितालाच विरोध करणे चालविले असल्याचा घणाघात या मेळाव्यात आमदार महालेंनी केला आहे. यावेळी काका कलंत्री, रमेश बाहेती, दयासागर महाले, पं. स. सदस्य जितेंद्र कलंत्री, गजानन इंगळे, संजय महाले, बळीराम काळे, राधा कापसे, राजू राठी, भीमराव अंभोरे, गणेश यंगड आदींची प्रमुख उपस्थिती होती. संचालन अमोल साठे, तर आभार सुनील पोफळे यांनी मानले.

चिखली बाजार समितीत सुविधा नाही !

देशभरातील बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालतात. त्याचप्रमाणे चिखली बाजार समितीमध्ये सुद्धा दरवर्षी जवळपास दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त शेष जमा होत असतानाही कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नाही या पिळवणुकीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नवीन कृषी कायदे लागू करण्याचा जोरदार आग्रह आ. श्वेता महाले यांनी यावेळी केला आहे.