शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

जिगाव प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा!

By admin | Updated: December 25, 2016 02:24 IST

प्रकल्पासाठी १0५५.६४ हेक्टर वनजमीन वळती.

बुलडाणा, दि. २४- जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या जिगाव पाटबंधारे प्रकल्पाकडे वनजमीन उपलब्ध नसल्याने प्रकल्पाच्या बांधकामाचा प्रश्न कित्येक दिवसांपासून प्रलंबीत होता. वन विभागाने जिगाव पाटबंधारे प्रकल्पासाठी १0५५.६४ हेक्टर वनजमिन वळती केल्याने जिगाव पाटबंधारे प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.सिंचन प्रकल्पासून दुरपर्यंतच्या शेतकर्‍यांच्या शेतीला एक प्रकारची संजीवनीच मिळते. सिंचन प्रकल्पाच्या पाण्यावर परिसरातील शेतीमध्येही नेहमी हिरवळ राहते. तसेच सिंचन प्रकल्पामुळे उत्पादनात वाढ होऊन त्या शेतकर्‍यांचा विकास साधण्यास मदत होते. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जिगाव सिंचन प्रकल्प सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूरा, शेगाव, खामगाव, मलकापूर, तसेच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, या आठ तालुक्यांना वरदान ठरणारा हा प्रकल्प २00८ मध्ये सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ७३७ दलघमी असून, त्यामुळे ८४ हजार २४0 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. या प्रकल्पामुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता २0 टक्क्यांपयर्ंत पोहोचू शकते. एवढा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतांना या प्रकल्पाच्या बांधकामाकरिता प्रकल्पाकडे वनजमीन उपलब्ध नसल्यामुळे मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी, महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी कार्यकारी अभियंता मून प्रकल्प खामगाव विभाग यांच्याकडून वन (संवर्धन) अधिनियम, १९८0 अंतर्गत जिगाव मोठा पाटबंधारे प्रकल्पाच्या बांधकामाकरिता १0५५.६५ हेक्टर वनजमिन वळती करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. तेंव्हा जिगाव प्रकल्प हा जिल्ह्याच्या फायद्याचा असून त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार असल्याने १0५५.६५ हेक्टर वनजमिन वळती करण्याचे आदेश शासनाच्या वन विभागाने १५ डिसेंबर रोजी दिले आहेत. ज्यामध्ये अवर्गीकृत राखीव वनजमिन व संरक्षित वनजमिन समाविष्ट आहे. जिगाव प्रकल्पाला वनजमिन मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या बांधकामाचा प्रश्न सुटणार आहे. प्रकल्प यंत्रणेवर राहणार मुख्य वनसंरक्षकांची नजरजिगाव प्रकल्पासाठी १0५५.६४ हेक्टर वनजमिन वळती केल्यानंतर त्यासाठी प्रकल्प यंत्रणेला विविध अटींचे अनुपाल करावे लागणार आहे. यादरम्यान प्रकल्प यंत्रणेवर अमरावतीचे मुख्य वनसंरक्ष प्रा.यांची नजर राहणार आहे. यासंदर्भात अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक हे प्रकल्प यंत्रणेची वेळोवेळी चौकशी करून तसा अहवाल अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांना सादर करतील. तसेच यामध्ये वन संवर्धन अधिनियम, १९८0 व त्याअंतर्गत केलेल्या नियमांचे पालन न केल्यास संबंधीतांवर कार्यवाही सुद्धा होऊ शकते.