शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उपदेश करताना श्रवण करणाराही तेवढाच ज्ञानी हवा - शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:47 IST

साखरखेर्डा : गुरुंनी केलेला उपदेश हा महत्त्वाचा असून, तो श्रवण करताना घेणाराही तेवढाच ज्ञानी हवा, असा उपदेश श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्या नृसिंह स्वामी महाराज यांनी दिला.

ठळक मुद्देशंकराचार्य श्री विद्या नृसिंह स्वामी महाराज यांचा उपदेश

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : गुरुंनी केलेला उपदेश हा महत्त्वाचा असून, तो श्रवण करताना घेणाराही तेवढाच ज्ञानी हवा, असा उपदेश श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्या नृसिंह स्वामी महाराज यांनी दिला.प्रल्हाद महाराज शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवानिमित्त संत संमेलनात ते बोलत होते. यावेळी विचार पीठावर सद्गुरू १00८ सिद्धलिंग शिवाचार्य स्वामी, गणेश्‍वर शास्त्री द्रावीड, नाना महाराज लोणीकर, विजयकाका पोफळी, सुरेश महाराज ब्रम्हचारी, नरेंद्र महाराज चौधरी, भास्कर महाराज उपस्थित होते.शंकराचार्य प्रबोधनातून बोलताना म्हणाले की, श्रीरामचंद्रांनी लंकेश्‍वरावर विजय मिळविल्यानंतर अयोध्या नगरीत आले. त्याठिकाणी विजय उत्सव साजरा करण्याचे ठरले. त्यावेळी सर्व राजांना आमंत्रित करण्यात आले. त्याचक्षणी सर्व राजे उभे राहून विश्‍वमित्राचा सन्मान करू लागले; परंतु एक राजा तसाच बसून होता. त्यांच्यावर नजर गेली. माझा घोर अपमान करणार्‍या या राजाला कठोर शिक्षा करण्याचे श्रीरामाला फर्मान सोडले. श्रीरामांनी मृत्यूदंडाची शिक्षा करण्याचे वचन विश्‍वमित्राला दिले; परंतु चार दिवसांपासून मृत्यूदंडाची शिक्षा ऐकून तो राजा गलीतगात्र झाला होता. काय करावे, हे सुचत नव्हते. तेवढय़ात हनुमंतांनी डाव्या खांद्यावर त्या राजाला घेतले. श्रीरामाचा पारा चढला. माझाच भक्त हे काम करतो. तेवढय़ात भात्यातील एक-एक बाण काढून त्या राजाला मारणार तेवढय़ात हनुमंतांनी उजव्या कानात मंत्र दिला. तो मंत्र राजाने उच्चारला, अशा प्रकारे राम नामाचा मंत्र  सांगितल्याने राजाचे प्राण वाचले. तेव्हा नारदमुनी आणि हनुमान यांनी रामाचे चरण धरुन म्हणाले की, श्रीरामापेक्षा श्रीराम नामातच एवढी शक्ती आहे की, ती संकटेसुद्धा दूर करते, त्यामुळे प्रत्येकाने श्रीरामाचा जप मनोभावे करावा. गुरुंनी शिष्यांना गुरू प्रमाणेच मान द्यावा. त्यात अंतर असू नये. प्रल्हाद महाराज यांनीसुद्धा श्रीराम नामाचा जप केला. ज्ञानेश्‍वर महाराजांनीसुद्धा गुरुने गुरुच करावा, असे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मनुष्याच्या मनात संशय नसावा, त्यांनी निसंकोच कार्य करावे, ते कार्य निश्‍चित सिद्धीला जाते.नरेंद्र महाराज अकोला यांनी नाथ पंथाचे तत्त्वज्ञान सांगताना जात, धर्म, पंथ न पाळता मनुष्याने सेवाकार्य करावे, तेच कार्य प्रल्हाद महाराज यांनी केले, असे प्रबोधन केले. यावेळी विचार पीठावरील सर्वच गुरुजनांनी प्रबोधन केले. प्रास्ताविक, मनोगत आचार्य रामदासपंत यांनी मांडले.