शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

उपदेश करताना श्रवण करणाराही तेवढाच ज्ञानी हवा - शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:47 IST

साखरखेर्डा : गुरुंनी केलेला उपदेश हा महत्त्वाचा असून, तो श्रवण करताना घेणाराही तेवढाच ज्ञानी हवा, असा उपदेश श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्या नृसिंह स्वामी महाराज यांनी दिला.

ठळक मुद्देशंकराचार्य श्री विद्या नृसिंह स्वामी महाराज यांचा उपदेश

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : गुरुंनी केलेला उपदेश हा महत्त्वाचा असून, तो श्रवण करताना घेणाराही तेवढाच ज्ञानी हवा, असा उपदेश श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्या नृसिंह स्वामी महाराज यांनी दिला.प्रल्हाद महाराज शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवानिमित्त संत संमेलनात ते बोलत होते. यावेळी विचार पीठावर सद्गुरू १00८ सिद्धलिंग शिवाचार्य स्वामी, गणेश्‍वर शास्त्री द्रावीड, नाना महाराज लोणीकर, विजयकाका पोफळी, सुरेश महाराज ब्रम्हचारी, नरेंद्र महाराज चौधरी, भास्कर महाराज उपस्थित होते.शंकराचार्य प्रबोधनातून बोलताना म्हणाले की, श्रीरामचंद्रांनी लंकेश्‍वरावर विजय मिळविल्यानंतर अयोध्या नगरीत आले. त्याठिकाणी विजय उत्सव साजरा करण्याचे ठरले. त्यावेळी सर्व राजांना आमंत्रित करण्यात आले. त्याचक्षणी सर्व राजे उभे राहून विश्‍वमित्राचा सन्मान करू लागले; परंतु एक राजा तसाच बसून होता. त्यांच्यावर नजर गेली. माझा घोर अपमान करणार्‍या या राजाला कठोर शिक्षा करण्याचे श्रीरामाला फर्मान सोडले. श्रीरामांनी मृत्यूदंडाची शिक्षा करण्याचे वचन विश्‍वमित्राला दिले; परंतु चार दिवसांपासून मृत्यूदंडाची शिक्षा ऐकून तो राजा गलीतगात्र झाला होता. काय करावे, हे सुचत नव्हते. तेवढय़ात हनुमंतांनी डाव्या खांद्यावर त्या राजाला घेतले. श्रीरामाचा पारा चढला. माझाच भक्त हे काम करतो. तेवढय़ात भात्यातील एक-एक बाण काढून त्या राजाला मारणार तेवढय़ात हनुमंतांनी उजव्या कानात मंत्र दिला. तो मंत्र राजाने उच्चारला, अशा प्रकारे राम नामाचा मंत्र  सांगितल्याने राजाचे प्राण वाचले. तेव्हा नारदमुनी आणि हनुमान यांनी रामाचे चरण धरुन म्हणाले की, श्रीरामापेक्षा श्रीराम नामातच एवढी शक्ती आहे की, ती संकटेसुद्धा दूर करते, त्यामुळे प्रत्येकाने श्रीरामाचा जप मनोभावे करावा. गुरुंनी शिष्यांना गुरू प्रमाणेच मान द्यावा. त्यात अंतर असू नये. प्रल्हाद महाराज यांनीसुद्धा श्रीराम नामाचा जप केला. ज्ञानेश्‍वर महाराजांनीसुद्धा गुरुने गुरुच करावा, असे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मनुष्याच्या मनात संशय नसावा, त्यांनी निसंकोच कार्य करावे, ते कार्य निश्‍चित सिद्धीला जाते.नरेंद्र महाराज अकोला यांनी नाथ पंथाचे तत्त्वज्ञान सांगताना जात, धर्म, पंथ न पाळता मनुष्याने सेवाकार्य करावे, तेच कार्य प्रल्हाद महाराज यांनी केले, असे प्रबोधन केले. यावेळी विचार पीठावरील सर्वच गुरुजनांनी प्रबोधन केले. प्रास्ताविक, मनोगत आचार्य रामदासपंत यांनी मांडले.