शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बुलडाणा जिल्ह्यात अवघे तीन टक्केच पीक कर्ज वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:35 IST

एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ असताना प्रत्यक्षात ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे अर्थात अवघे तीन टक्केच पीक कर्ज बँकांनी वाटप केलेले आहे.

ठळक मुद्देजिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला ४७ कोटी २५ लाख रुपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. बँकेने २० कोटी ७९ लाख रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे. बँकांनी चार हजार १८२ शेतकºयांना ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असतानाच पीक कर्ज वाटपाची गती तुलनेने संथ असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरापासून दुष्काळाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती मशागतीसह, पेरणीसाठीचे बि-बियाणे खरेदीसाठी सध्या पैशाची गरज आहे. त्यानुषंगाने विचार करता एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ असताना प्रत्यक्षात ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे अर्थात अवघे तीन टक्केच पीक कर्ज बँकांनी वाटप केलेले आहे.त्यामुळे पीक कर्जाचा वेग वाढविण्याची गरज प्रतिपादीत होत आहे. दुसरीकडे पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्यासोबतच दर पंधरवाड्याला लीड बँकेकडून पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास सव्वातीन लाख शेतकºयांना यंदा पीक कर्ज वाटपाचे जिल्ह्यातील व्यापारी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ग्रामीण बँकेला उदिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची दोलायमान स्थिती पाहता या बँकेवर तुलनेने कमी बोजा टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश मदार ही राष्ट्रीय बँकावरच राहणार आहे.जिल्ह्यात खासगी बँकांना २४० कोटी ८८ लाख रुपयांचे उदिष्ठ देण्यात आले आहे. त्यापैकी या बँकांनी आतापर्यंत ७०८ शेतकºयांना ११ कोटी ५० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यांच्या एकूण उदिष्ठाच्या ते जवळपास पाच टक्के आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला २८१ कोटींचे उदिष्ट असून त्यांनी प्रत्यक्षात ४४१ शेतकºयांना तीन कोटी ९३ लाख ४२ हजार रुपयांचे पीक कर्ज दिले आहे. बँकेला मिळालेल्या उदिष्टाच्या ते अवघे दीड टक्का ही नाही.जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला ४७ कोटी २५ लाख रुपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी एक हजार ३११ शेतकºयांना जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने २० कोटी ७९ लाख रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे.सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एक हजार २०४ कोटींचे पीक कर्जाचे उदिष्ट दिलेले आहे. मात्र या बँकांचा पीक कर्ज वाटपाचा वेग हा अत्यंत धिमा आहे. आतापर्यंत या बँकांनी एक हजार ७०२ शेतकºयांना उदिष्टाच्या १.१० टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. जवळपास १३ कोटी २५ लाखांच्या घरात ही रक्कम जाते.प्रत्यक्षात जिल्हयातील बँकांनी चार हजार १८२ शेतकºयांना ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.दुसरीकडे गेल्या खरीपात शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. पावसाने ओढ दिल्याने शेतीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले. बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये २०१८ च्या तुलनेत ५०० कोटी रुपयांची आवक घटली आहे. परिणामी शेतकºयांच्या हातातील पैसाही तुलनेने घटला आहे. त्यातच शेतकरी कर्जमाफीचेही त्रांगडे कायम आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर समस्या आहेत. दुष्काळी स्थिती पाहता जवळपास ५६० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे यंदा पूनर्गठन करावे लागणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक