शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जल, जंगल आणि जमिन टिकले तरच देशाचे भविष्य उज्वल! - पोपटराव पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 14:34 IST

खामगाव: जल...जंगल...जमीन आणि जन या चतुसुत्रींवरच भारतीय संस्कृती आधारीत असून, आदिवासी हे या संस्कृतीचा मुळ गाभा आहेत, असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जल...जंगल...जमीन आणि जन या चतुसुत्रींवरच भारतीय संस्कृती आधारीत असून, आदिवासी हे या संस्कृतीचा मुळ गाभा आहेत, असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी येथे केले. जळगाव जामोद तालुक्यातील इको व्हिलेज सालईबन येथे आदिवासींशी संवाद साधताना ते बोलत होते.पाणी फांउडेशनच्या वाटर स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव जामोद तालुक्यातील विविध गावांची पाहणी करण्यासाठी त्यांनी बुलडाणा जिल्ह्यात दौरा केला. यावेळी त्यांनी जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सालईबन येथील निसर्ग प्रकल्पाला भेट दिली. बांडापिंपळ, वडपाणी या गावातील आदिवांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जल, जंगल, जमिन आणि जनांशी एकरूप झाल्यास भारताला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, यासाठी सालईबन, बांडापिंपळ यासारख्या आदिवासी गावांनी हिरवळीशी जी नाळ जोडली आहे. ती प्रत्येकाला कायम ठेवावी लागेल, असेही त्यांनी नि:क्षून सांगितले. भारताची संस्कृती ही आदिवासी जनजातींमध्येच वसलेली आहे. ज्यांनी निसर्गालाच देवता मानल्याने जंगल राखल्या गेली. मात्र, विकासाच्या भ्रामक कल्पनांमुळे वनराई नष्ट होत आहे. ह्यविकासह्ण हे मृगजळ असून त्याच्या मागे धावण्यापेक्षा आपली मूळ टिकून ठेवणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत, बांडापिंपळ, वडपाणी आणि सालईबन यांनी हिरवळीच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबाबत समाधानही व्यक्त केले.    ग्रामसंस्कृतीह्ण हीच विकासाची निती!भारतातील एकुण लोकसंख्येच्या ७०टक्के लोकसंख्या खेड्यात वसली आहे. ग्रामसंस्कृतीला चालना देण्यासाठी सालईबनचे योगदान मोठं आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेने, आचार्य विनोबांच्या भूदान जमिनीवर आणि गांधीच्या विचारावर ह्यतरूणाईह्णचे काम येथे सुरू आहे. नव भारताच्या निर्मितीचे धडे अनेक युवक गिरवित आहेत. हीच ग्रामस्वराज्याची संकल्पना आपआपल्या गावात राबवित आहेत. ही नक्कीच परिवर्तनाची नांदी म्हणता येईल.  खेड्याकडे चला  या मूलमंत्राचा अंगिकार करा!राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ह्यखेड्या कडे चलाह्णहा मूलमंत्र दिला आहे. देशात सर्वत्र त्यांची १५० वी जयंती साजरी होत आहे. समाजातील इतर घटकांनी सुध्दा गांधी-विनोबाजींच्या सर्वोदयी विचारांचा अंगिकार करीत, स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सज्ज व्हावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोद