शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

मुदतवाढीनंतर १४ टक्के शेतकऱ्यांनीच काढला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 12:24 IST

Crop insurance : जिल्ह्यातील ८४ हजार ५९६ शेतकऱ्यांनी अर्थात १४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला.

- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीप पीक विम्यासाठी जवळपास नऊ दिवसांची मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यातील ८४ हजार ५९६ शेतकऱ्यांनी अर्थात १४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. मात्र, गेल्या वर्षी विमा काढलेल्या शेतकऱ्यांशी यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना करता केवळ ३८ टक्केच शेतकऱ्यांनी विमा काढल्यचे स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ८७ हजार ८४८ आहे. यापैकी साधारणत: दरवर्षी ५० टक्के शेतकरी विमा काढतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना आलेले कटू अनुभव पाहता शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याकडे कल कमी झाला असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसते. त्यातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गासोबतच प्रशासकीय यंत्रणेमधील दिरंगाई, असा दुहेरी फटका बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्याला मोठा फटका दिला आहे. २०१९ मध्ये वार्षिक सरासरीच्या २२ टक्के परतीचा पाऊस झाला होता. गेल्या वर्षीही अशीच स्थिती होती. त्यामुळे नेमके उत्पादन हाती येण्याच्या काळातच शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्या तुलनेत विमा कंपन्या व प्रशासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने नुकसान होऊनही पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहत असल्याचा गत दोन वर्षांतील अनुभव आहे. त्यामुळे पीक विम्याच्या नुकसानभरपाई मिळण्याच्या निकषात किंवा आनुषंगिक तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणा