शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुदतवाढीनंतर १४ टक्के शेतकऱ्यांनीच काढला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 12:24 IST

Crop insurance : जिल्ह्यातील ८४ हजार ५९६ शेतकऱ्यांनी अर्थात १४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला.

- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीप पीक विम्यासाठी जवळपास नऊ दिवसांची मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यातील ८४ हजार ५९६ शेतकऱ्यांनी अर्थात १४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. मात्र, गेल्या वर्षी विमा काढलेल्या शेतकऱ्यांशी यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना करता केवळ ३८ टक्केच शेतकऱ्यांनी विमा काढल्यचे स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ८७ हजार ८४८ आहे. यापैकी साधारणत: दरवर्षी ५० टक्के शेतकरी विमा काढतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना आलेले कटू अनुभव पाहता शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याकडे कल कमी झाला असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसते. त्यातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गासोबतच प्रशासकीय यंत्रणेमधील दिरंगाई, असा दुहेरी फटका बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्याला मोठा फटका दिला आहे. २०१९ मध्ये वार्षिक सरासरीच्या २२ टक्के परतीचा पाऊस झाला होता. गेल्या वर्षीही अशीच स्थिती होती. त्यामुळे नेमके उत्पादन हाती येण्याच्या काळातच शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्या तुलनेत विमा कंपन्या व प्रशासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने नुकसान होऊनही पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहत असल्याचा गत दोन वर्षांतील अनुभव आहे. त्यामुळे पीक विम्याच्या नुकसानभरपाई मिळण्याच्या निकषात किंवा आनुषंगिक तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणा