शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी 'एक गाव एक बालरक्षक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:15 IST

स्थलांतरीत होणाऱ्या बालकांना शाळांत दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने गाव तेथे बालरक्षक ही संकल्पना पुढे आणली आहे.

खामगाव : कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत होणाऱ्या बालकांना शाळांत दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने गाव तेथे बालरक्षक ही संकल्पना पुढे आणली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात बालरक्षक नेमण्यात येत आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने उपक्रम सुरू केला आहे.कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील विविध जिल्ह्यातून व बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक परतले आहेत. त्यांच्यासोबत असलेली ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालके शाळाबाह्य असण्याची शक्यता आहे. प्रत्येक मुल शाळेत गेलेच पाहिजे, यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ३ आॅगस्ट रोजी संवाद साधून राज्यातील बालरक्षक चळवळीतील समोरील आव्हाने, पुढील दिशा या विषयावर मार्गदर्शन केले. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे कुटुंबे स्थलांतरीत होत आहेत. त्यामध्ये इतर जिल्ह्यातून राज्यातून येणारे व जिल्ह्यातून दुसरा जिल्ह्यात व दुसºया राज्यात जाणारे कुटुंब आहेत. या कुटुंबासोबत ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालके सुद्धा आहेत. ही बालके शाळाबाह्य तर नाही ना, याचा शोध शिक्षण विभाग घेत आहे. शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाकडून कार्यवाही केली जाणार आहे. प्रत्येक शिक्षक बालरक्षक आहे. प्रत्येकाने प्रभावी अंमलबजावणीकरीता प्रत्येक शाळेत, प्रत्येक गावात एक बालक रक्षक नेमावा अशा सूचना आहेत.

प्रत्येक गावात  बालरक्षकाची नियुक्तीनिस्वार्थपणे बालरक्षक म्हणून काम करण्याची तळमळ आहे, त्यांना बालरक्षक म्हणून नेमावे. बालरक्षक कुणालाही बनविता येऊ शकते. बालरक्षकांवर संपूर्ण गावातील शाळाबाह्य बालकांची जबाबदारी राहील. आवश्यकतेनुसार बालरक्षक शिक्षकांचे सहकार्य घेतील. बालरक्षकाचे नाव शाळेच्या दर्शनी भागावर व ग्रामपंचायतच्या दर्शनी भागावर लावावे असेही सांगण्यात आले आहे. बालकांचे पोषण, रक्षण व शिक्षण या तीन गोष्टींवर बालरक्षकांनी काम करावे असेही ठरविण्यात आले आहे.

स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्नविद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक आरोग्य, भाविनक व सामाजिक संतुलन, मूलभूत क्षमता या बाबींवर बालरक्षकांनी लक्ष द्यावे, सध्या आॅनलाइन शिक्षण सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल नाही त्यांच्यापर्यंत शिक्षकांच्या सहकार्याने बालरक्षकांनी पोहोचावे. स्थलांतरामुळे मुलांच्या शाळा बदलतात, त्यामुळे स्थलांतर थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र