शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

सीबीएसईचे एक हजार विद्यार्थी परीक्षा न देता पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:34 IST

सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या लेखी ...

सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र, राज्य शासनानेसुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी भूमिका घेणारा पालकांचा एक गट आहे. दहावीची म्हणजे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवासाचा पहिला टप्पा आहे. त्यामुळे परीक्षा न घेता दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्य नाही, असे मानणारा पालकांचा दुसरा गट आहे. यावर्षी जिल्ह्यातून सीबीएसई दहावीच्या परीक्षेसाठी एक हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य शासनाने सीबीएसईप्रमाणे निर्णय घेऊ नये, असे स्पष्ट मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीसुध्दा याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे दहावीच्या

विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत विचार न करता अभ्यास सुरू ठेवावा, असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्याकडून सांगितले जात आहे.

सीबीएसई दहावीच्या एकूण शाळा

१५

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी

१०००

जे विद्यार्थी हुशार आहेत, मेरीटमध्ये येणार आहेत, त्यांच्यामध्ये या निर्णयामुळे नाराजी आहे. पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे मागील गुण भरावेच लागतात. त्यामुळे परीक्षा जरी रद्द झाल्या तरी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. बोर्डाच्या सूचनेनुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येईल.

गजानन निकस, प्राचार्य, सीबीएसई स्कूल, मेहकर.

दहावीची परीक्षा घेणे आवश्यक असले, तरी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सीबीएसईप्रमाणे राज्य शासनाने एसएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात.

- संजय देशमुख, पालक.

दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच शासनाने परीक्षा घ्यावी. परीक्षा रद्द करण्याची घाई करू नये. विद्यार्थांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करणे योग्य नाही.

- विजय क्षीरसागर, पालक.