शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बुलडाणा तालुक्यातील मढ येथे पूर्व वैमनस्यातून एकाचा खून; पाच संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:34 IST

धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात खोदण्यात आलेल्या गड्डय़ात मृतदेह पुरण्यात आला होता.

ठळक मुद्देमराठवाड्याच्या सीमेलगतची घटनाश्‍वान पथकाने काढला माग!

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात खोदण्यात आलेल्या गड्डय़ात मृतदेह पुरण्यात आला होता.धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या मढ येथील विजय पुनीलाल चांदा (३६) हे १३ जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते; मात्र नातेवाइकांनी १४ जानेवारी रोजी शोध घेऊनही ते सापडले नाहीत. दरम्यान, विजय चांदा यांचा भाऊ राजू पुनीलाल चांदा यांनी १५ जानेवारी रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार धाड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून बेपत्ता व्यक्तीच्या  कुटुंबियांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, मढ येथील पैनगंगा नदीच्या पुलाजवळच्या रस्त्यावर संशयास्पद स्थितीत रक्ताचे डाग  आणि विजय चांदा यांची चप्पल दिसल्यामुळे बेपत्ता इसमाच्या नातेवाइकांनी  पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी श्‍वान पथकास पाचारण केले असता, श्‍वानाने रक्ताचे डाग असलेल्या रस्त्यावर २ कि.मी. अंतरावरील चिचतळ्य़ानजीक एका खड्डय़ाजवळ पोलिसांना नेऊन पोहोचवले. त्या खड्डय़ात बेपत्ता असलेल्या विजय चांदा याचा खून करून त्यांचे पार्थिव गाडण्यात आल्याचे दिसून आले. त्यानुषंगाने नंतर पोलिसांनी पंचनामा करून मृत विजय चांदाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून विजय चांदा यांचा  पूर्व वैमनस्यातून ईश्‍वर रामचंद्र बालोद, त्याची तीन मुले दिवान बालोद, महिपाल बालोद, गोपाल बालोद आणि विजय नारायण बालोद यांनी खून केल्याचा संशय व्यक्त करीत पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली धाडचे ठाणेदार संग्राम पाटील, पोलीस कर्मचारी गजानन मुंडे आणि सहकारी करीत आहेत.

२0१५ मध्ये झाला होता वादसाधारणपणे २0१५ मध्ये मृत विजय चांदा याच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी महीपाल बालोद व इतरांवर युवतीची छेड काढण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला होता. तर याच घटनेत महीपाल बालोद याच्या तक्रारीवरून विजय चांदा व इतरांवर गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल केले गेले होते. हे प्रकरण तीन वर्षांपासून न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान, याचाच राग मनात धरून विजय चांदाचा खून झाल्याचा संशय मृत विजयच्या नोतवाइकांनी दिली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना बुलडाणा येथे वैद्यकीय तपासणीसाठी सायंकाळी आणण्यात आले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हाMurderखून