शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

बुलडाणा तालुक्यातील मढ येथे पूर्व वैमनस्यातून एकाचा खून; पाच संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:34 IST

धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात खोदण्यात आलेल्या गड्डय़ात मृतदेह पुरण्यात आला होता.

ठळक मुद्देमराठवाड्याच्या सीमेलगतची घटनाश्‍वान पथकाने काढला माग!

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात खोदण्यात आलेल्या गड्डय़ात मृतदेह पुरण्यात आला होता.धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या मढ येथील विजय पुनीलाल चांदा (३६) हे १३ जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते; मात्र नातेवाइकांनी १४ जानेवारी रोजी शोध घेऊनही ते सापडले नाहीत. दरम्यान, विजय चांदा यांचा भाऊ राजू पुनीलाल चांदा यांनी १५ जानेवारी रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार धाड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून बेपत्ता व्यक्तीच्या  कुटुंबियांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, मढ येथील पैनगंगा नदीच्या पुलाजवळच्या रस्त्यावर संशयास्पद स्थितीत रक्ताचे डाग  आणि विजय चांदा यांची चप्पल दिसल्यामुळे बेपत्ता इसमाच्या नातेवाइकांनी  पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी श्‍वान पथकास पाचारण केले असता, श्‍वानाने रक्ताचे डाग असलेल्या रस्त्यावर २ कि.मी. अंतरावरील चिचतळ्य़ानजीक एका खड्डय़ाजवळ पोलिसांना नेऊन पोहोचवले. त्या खड्डय़ात बेपत्ता असलेल्या विजय चांदा याचा खून करून त्यांचे पार्थिव गाडण्यात आल्याचे दिसून आले. त्यानुषंगाने नंतर पोलिसांनी पंचनामा करून मृत विजय चांदाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून विजय चांदा यांचा  पूर्व वैमनस्यातून ईश्‍वर रामचंद्र बालोद, त्याची तीन मुले दिवान बालोद, महिपाल बालोद, गोपाल बालोद आणि विजय नारायण बालोद यांनी खून केल्याचा संशय व्यक्त करीत पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली धाडचे ठाणेदार संग्राम पाटील, पोलीस कर्मचारी गजानन मुंडे आणि सहकारी करीत आहेत.

२0१५ मध्ये झाला होता वादसाधारणपणे २0१५ मध्ये मृत विजय चांदा याच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी महीपाल बालोद व इतरांवर युवतीची छेड काढण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला होता. तर याच घटनेत महीपाल बालोद याच्या तक्रारीवरून विजय चांदा व इतरांवर गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल केले गेले होते. हे प्रकरण तीन वर्षांपासून न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान, याचाच राग मनात धरून विजय चांदाचा खून झाल्याचा संशय मृत विजयच्या नोतवाइकांनी दिली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना बुलडाणा येथे वैद्यकीय तपासणीसाठी सायंकाळी आणण्यात आले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हाMurderखून