शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

समृद्धीवर अपघातामध्ये एक ठार, तीन जखमी; मांडव्यानजीक नागपूर कॉरिडॉरमध्ये अपघात

By निलेश जोशी | Updated: April 11, 2024 20:18 IST

हा अपघात ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नागपूर कॉरिडॉरमध्ये मांडवा गावानजीक घडला.

मलकापूर पांग्रा: समृद्धी महामार्गावर लोणार तालुक्याच्या हद्दीत भरधाव वेगातील ट्रकने समोरील ट्रकला पाठिमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये समोरील ट्रक पुलाच्या कठड्याला धडकून उलटला. यामध्ये ट्रकमधील चालक रणजीत गौतम (४०, रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) हा जागीच ठार झाला तर त्याचे ट्रकमधील तीन व दुसऱ्या ट्रकमधील एक जण असे चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडला.

हा अपघात ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नागपूर कॉरिडॉरमध्ये मांडवा गावानजीक घडला. एमएच-०४- केएफ-८७४० या ट्रकला एमएच-४८-सीक्यू-४८२८ क्रमांकाच्या ट्रकने पाठीमागून धडक दिली. दोन्ही ट्रक हे जड वाहनांच्या लेनमध्येच होते. ही धडक ऐवढी जबर होती की समोरील ट्रक पुलाच्या कठड्याला धडकून उलटाल यामध्ये ट्रक चालक रणजीत गौतम (रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) हा जागीच ठार झाला. तर ट्रकमध्ये बसलेले त्याचे तीन सहकारी संतोष छोटूलाल हरिजन (२५, उरण, मुंबई), महिंद्र गौतम (५०) आणि सोनू गौतम (३०) आणि धडक देणाऱ्या ट्रकचा चालक असे चौघेजण जखमी झाले आहेत.

एमएच-४८-सीक्यू ४८२८ क्रमांकाचा ट्रक चालक रणजीतकुमार मुकेशकुमार (५०) याने भरधाव वेगाने ट्रक चालक समोरी ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. एमएच-०४-केएफ ८७४० क्रमांकाच्या ट्रकमध्ये जेट विमानासाठी लागणारे ऑईल आणि अन्य काही साहित्य नेल्या जात होते. या अपघातामध्ये समोरील ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या मधोमध असल्याने महामार्ग पोलिस पीएसआय गजानन उज्जैनकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल विठ्टल काळुसे, निवृत्ती सानप व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अमोल जाधव, उमेश नागरे, जयकुमार राठोड यांनी वाहतूक थांबवून जखमी यांना क्यूआरव्ही टीमचे हनुमंत जायभाये,श्रीरामे यांच्या मदतीने बाहेर काढले. जखमीना प्रथम बिबी, तेथून सिंदखेड राजा आणि नंतर जालना येथे हलविण्यात आले आहे. दोन्ही अपघात ग्रस्त वाहने दुसरबीड टोल नाक्यावर लावण्यात आली आहेत.लेनचे नियम न पाळल्याने दोन दिवसात दुसरा अपघातसमृद्धी महामार्गावर लेनचे नियम न पाळल्यामुळे दोन दिवसात मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान हा दुसरा अपघात झाला आहे. १० एप्रिल रोजी ट्रकचालकाने अचानक लेन बदलल्याने अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले होते.