शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

काेतवाल आत्महत्या प्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

याप्रकरणी मोताळा तहसील कार्यालयात कार्यरत तिघांविरुद्ध मृत व्यक्तीच्या मुलाच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

याप्रकरणी मोताळा तहसील कार्यालयात कार्यरत तिघांविरुद्ध मृत व्यक्तीच्या मुलाच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपींचा शोध बोराखेडी पोलीस घेत आहेत.

नंदकिशोर पाखरे असे अटक झालेल्या आरोपीचे नाव असून तो तहसील कार्यालयामध्ये कार्यरत आहे तर संजय पारखेडकर व विनोद अनकुरणे या दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. हे दोघे सुद्धा मोताळा तहसील कार्यालयात कार्यरत आहेत.

मोताळा येथील तहसील कार्यालय तसेच तहसीलदारांची शासकीय निवासस्थान याची देखभाल करणारे कोतवाल विष्णू सुरपाटणे यांनी २७ जून रोजी दुपारी तहसीलदार यांच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात चिठ्ठी सुद्धा आढळली हाेती़ त्यामध्ये तीन नावांचा उल्लेख त्यांनी केलेला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

याप्रकरणी मृतक व्यक्तीचा मुलगा दर्शन विष्णू सुरपाटणे यांनी या प्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनला २८ जून रोजी फिर्याद दिली असून मोताळा तहसील कार्यालयात कार्यरत तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतक व्यक्तीच्या चिठ्ठीमध्ये तसेच देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक ठाणेदार राहुल जंजाळ करीत आहेत.

महिला कर्मचाऱ्याबरेाबर सेटींग लावण्यासाठी दबाव

तिन्ही आरोपींनी मृतक व्यक्तीस दोन महिला कर्मचाऱ्यांसोबत सेटिंग लावून देण्यासंदर्भात दबाव आणत होते व तसे न केल्यास पगार व टीएडीए काढणार नाही अशी धमकी देत हाेते, असा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. मृतक व्यक्तीचा मुलगा दर्शन सुरपाटणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील मागील काही दिवसांपासून आरोपींच्या त्रासामुळे दबावात होते. २६ जून रोजी सायंकाळी नंदकिशोर पाखरे याने विष्णू सुरपाटणे यांना फोन करून तहसील कार्यालयात बोलविले होते होते. त्यावेळी ते खूप तणावात हाेते,असेही फिर्यादीत म्हटले आहे़