शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयाबाहेर भरते दुसरे कार्यालय

By admin | Updated: June 2, 2015 02:26 IST

अधिकारी बदलताच भीती संपली ; बुलडाण्याच्या आरटीओ कार्यालयात दलालांचा मुक्त वावर.

बुलडाणा : महेश झगडे या सनदी अधिकार्‍याने बुलडाण्यापासून मुंबईपर्यंतच्या तमाम आरटीओ कार्यालयांना गेली काही महिने प्रचंड शिस्त लावली होती. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही म्हणणारी जनता कोणत्याही एजंटाची मदत न घेता नियमानुसार पैसे देऊन आपले काम करून आणत होते; मात्र शासनाने झगडे यांची बदली केली आणि आरटीओतील दहशतच संपली. पर्यायाने आरटीओ कार्यालयांमध्ये पुन्हा बेशिस्त सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आरटीओ कार्यालयात दलालांची मक्तेदारी वाढत असून, त्यांच्याकडून विविध कामे घेऊन येणार्‍या वाहनधारकांची आर्थिक लूट होत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व महत्त्वाची कामे परिसरात दलालामार्फत होत असल्यामुळे कार्यालयाबाहेर दुसरे कार्यालय भरत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागात वाढता दलालांचा वावर लक्षात घेऊन परिवहन आयुक्तांनी आरटीओ कार्यालयात दलालांना प्रतिबंध घालण्याचा फतवाच काढला होता; मात्र या आदेशामुळे बेरोजगारांचे नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून या आदेशाच्या विरोधात अकोला ट्रक ओनर्स असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. मार्च २0१५ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश काढून दलालांवरील प्रतिबंध आदेशावर निकाल दिला. यानुसार अधिकृत दलालांनाच आरटीओ कार्यालयांमध्ये काम करू देण्यास मान्यता दिली. यानंतरही शहरातील आरटीओ कार्यालयात पुन्हा सर्वच दलाल सक्रिय झाले आहे. त्यामुळे परिवहन विभागापुढे दलालमुक्तीचे आवाहन पुन्हा उभे ठाकले आहे. वाहन परवाना, नवीन गाडीचे रजिस्ट्रेशन, रिक्षा टॅक्सीचे परमिट आदींसह अन्य कामे थेट आरटीओच्या कार्यालयात कर्मचार्‍यांच्या माध्यमातून काम करायचे झाले तर त्याला अनेक फाटे फुटतात. दोन दिवसांत होणार्‍या कामाला किती दिवस लागतील, हे कोणीही सांगू शकत नाही; मात्र दलालांच्या माध्यमातून एखादे काम करायचे झाल्यास हे ठरल्या वेळेवर होते. आरटीओ कार्यालयात दलालांची मक्तेदारी वाढली आहे. या दलालांनी काही कर्मचार्‍यांच्या मदतीने परिवहन कार्यालयाबाहेर झाडाखाली, मुख्य प्रवेशद्वाराजवळ, भिंतीच्या आडोशाला कोपर्‍यात आपले स्वतंत्र्य कार्यालयच थाटल्याचे नजरेस पडते. कामाला आलेल्या नागरिकांना कार्यालयाबाहेर हेरले जाते. कोणतेही काम तत्काळ करून देण्याचे आमिष देऊन नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. आरटीओ कार्यालयात येणार्‍या नागरिकांची कामे त्वरित करा, त्यांना मार्गदर्शन करा, सूचनाचे माहिती फलक लावा, अशा सूचना देण्यात आल्या आहे. शिवाय परिवहन आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी कार्यालयात सुरू असून, एजंटांना कार्यालय परिसराबाहेर काम करण्याच्या सूचना आहे. शिवाय यासाठी जनतेकडूनही सहकार्य अपेक्षित आहे. या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरटीओ कार्यालयात येणार्‍या नागरिकांची कामे त्वरित करा, त्यांना मार्गदर्शन करा, सूचनाचे माहिती फलक लावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगीतले. शिवाय परिवहन आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी कार्यालयात सुरू असून, एजंटांना कार्यालय परिसराबाहेर काम करण्याच्या सूचना आहे. शिवाय यासाठी जनतेकडूनही सहकार्य अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.