शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कालवा दुरुस्तीच्या तांत्रिक कामात निधीचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 15:54 IST

एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्याने समस्या निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये महत्तम पाणी यंदा पावसाळा उशिरा संपल्याने उपलब्ध झाले असले तरी कालवा दुरुस्तीच्या तांत्रिक कामासाठी गरज असलेल्या एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्याने समस्या निर्माण झाली आहे.या वर्षी पावसाळा उशिरा संपला. सोबतच अकाळी पावसामुळेही जिल्ह्यातील प्रकल्पांवरील कालव्यांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच प्रकल्पाच्या ठिकाणी विमोचकाच्या दुरुस्तीची गरज आहे. पेनटाकळी प्रकल्पावरील ४९ किमी लांबीच्या कालव्यापैकी २० किमीच्या कालव्याच्या स्वच्छतेचे व दुरुस्तीचे काम काही प्रमात पूर्ण झाले असले तरी उर्वरित कामे मात्र अद्याप बाकी आहे. अशी स्थिती अन्य ठिकाणच्या प्रकल्पावरील कालव्यांची आहे. पाटबंधारे विभागच्या दृष्टीने यंदा पावसाळा उशिरा संपल्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांकडून पाण्याची अपेक्षीत मागणी होत नव्हती. मात्र आता ही मागणी वाढत आहे. मात्र कालव्यांची अपेक्षीत दुरुस्ती न झाल्यामुळे उपलब्ध पाणी सोडायचे कसे असा प्रश्न काही ठिकाणी आहे.दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी पाणी आरक्षण समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रकल्पांवरील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी तथा स्वच्छतेसाठी जवळपास पाच कोटी रुपायंची गरज असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यातच आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे कालवे क्षतीग्रस्तही झालेले होते. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची नितातंत गरज असल्याची भूमिका अधिकाºयांनी बैठकीत मांडली होती. त्यानुषंगाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाके (व्हीआयडीसी) विशेष निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप हा निधी उपलब्ध झालेला नाही.समृद्धी महामार्गाची कामे आणि अतिवृष्टीमुळे जिल्हयातील जवळपास ३०० किमी लांबीच्या मोठ्या प्रकल्पावरील कालव्यांच्या दुरुस्तीची समस्या आहे. सध्या कालवे स्वच्छतेची कामे दोन कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहेत.झाडा-झुडपांमुळे अडचणजिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून अवर्षण सदृश्य स्थिती होती. त्या कालावधीत कालव्यातून पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे या कालव्यांमध्ये झाडे, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे कालव्यांमध्ये पाणी सोडण्याची तयारी कशी करावी, असा प्रश्न असल्याचे एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. काही ठिकाणी कालव्यांची तांत्रिक कामेही करणे गरजेचे आहे.पेनटाकाळी प्रकल्पावरील कालव्याच्या स्वच्छतेसाठी साडेपाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यातून काही कामे करण्यात आली.जवळपास निम्म्या कालव्याच्या स्वच्छतेचे काम बाकी आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक असे १६ टक्के सिंचन होते. ही कामे होणे गरजेचे आहे.तांत्रिक कामांसाठीचा निधी उपलब्ध झालेला नाही. एक कोटी ८० लाख रुपयांचा हा निधी आहे. कालवा स्वच्छतेची कामे सुरू आहेत.- अनिल कन्ना,कार्यकारी अभियंता,बुलडाणा पाटबंधारे विभाग

टॅग्स :buldhanaबुलडाणा