शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

कालवा दुरुस्तीच्या तांत्रिक कामात निधीचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 15:54 IST

एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्याने समस्या निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये महत्तम पाणी यंदा पावसाळा उशिरा संपल्याने उपलब्ध झाले असले तरी कालवा दुरुस्तीच्या तांत्रिक कामासाठी गरज असलेल्या एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्याने समस्या निर्माण झाली आहे.या वर्षी पावसाळा उशिरा संपला. सोबतच अकाळी पावसामुळेही जिल्ह्यातील प्रकल्पांवरील कालव्यांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच प्रकल्पाच्या ठिकाणी विमोचकाच्या दुरुस्तीची गरज आहे. पेनटाकळी प्रकल्पावरील ४९ किमी लांबीच्या कालव्यापैकी २० किमीच्या कालव्याच्या स्वच्छतेचे व दुरुस्तीचे काम काही प्रमात पूर्ण झाले असले तरी उर्वरित कामे मात्र अद्याप बाकी आहे. अशी स्थिती अन्य ठिकाणच्या प्रकल्पावरील कालव्यांची आहे. पाटबंधारे विभागच्या दृष्टीने यंदा पावसाळा उशिरा संपल्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांकडून पाण्याची अपेक्षीत मागणी होत नव्हती. मात्र आता ही मागणी वाढत आहे. मात्र कालव्यांची अपेक्षीत दुरुस्ती न झाल्यामुळे उपलब्ध पाणी सोडायचे कसे असा प्रश्न काही ठिकाणी आहे.दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी पाणी आरक्षण समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रकल्पांवरील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी तथा स्वच्छतेसाठी जवळपास पाच कोटी रुपायंची गरज असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यातच आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे कालवे क्षतीग्रस्तही झालेले होते. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची नितातंत गरज असल्याची भूमिका अधिकाºयांनी बैठकीत मांडली होती. त्यानुषंगाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाके (व्हीआयडीसी) विशेष निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप हा निधी उपलब्ध झालेला नाही.समृद्धी महामार्गाची कामे आणि अतिवृष्टीमुळे जिल्हयातील जवळपास ३०० किमी लांबीच्या मोठ्या प्रकल्पावरील कालव्यांच्या दुरुस्तीची समस्या आहे. सध्या कालवे स्वच्छतेची कामे दोन कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहेत.झाडा-झुडपांमुळे अडचणजिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून अवर्षण सदृश्य स्थिती होती. त्या कालावधीत कालव्यातून पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे या कालव्यांमध्ये झाडे, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे कालव्यांमध्ये पाणी सोडण्याची तयारी कशी करावी, असा प्रश्न असल्याचे एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. काही ठिकाणी कालव्यांची तांत्रिक कामेही करणे गरजेचे आहे.पेनटाकाळी प्रकल्पावरील कालव्याच्या स्वच्छतेसाठी साडेपाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यातून काही कामे करण्यात आली.जवळपास निम्म्या कालव्याच्या स्वच्छतेचे काम बाकी आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक असे १६ टक्के सिंचन होते. ही कामे होणे गरजेचे आहे.तांत्रिक कामांसाठीचा निधी उपलब्ध झालेला नाही. एक कोटी ८० लाख रुपयांचा हा निधी आहे. कालवा स्वच्छतेची कामे सुरू आहेत.- अनिल कन्ना,कार्यकारी अभियंता,बुलडाणा पाटबंधारे विभाग

टॅग्स :buldhanaबुलडाणा