शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:23 IST

जमिनीखालील पाण्याची पातळी खालावलेली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या चिखली तालुक्यातील मेरा फाटा येथे एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून येणार्‍या काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे.

ठळक मुद्देमेरा फाटा गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा प्रशासनाचे नियोजन 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पामध्ये ३२ टक्के जलसाठा असून, जमिनीखालील पाण्याची पातळी खालावलेली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या चिखली तालुक्यातील मेरा फाटा येथे एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून येणार्‍या काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे.जिल्ह्यात एकूण १२७२ गावे असून, अनेक गावात विविध प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यात येतो; मात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पामुळे २२.१७ टक्के जलसाठा असून दिवसे्दिवस हा जलसाठा खालावत आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम तोट्यात आला असून परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाचे नियोजन केले होते. त्यामुळे विविध प्रकल्पासह जमिनीखालील पाण्याची पातळी घटत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी पाणीटंचाईचा फटका बसून टंचाईग्रस्त गावांची वाढती संख्या पाहता लोणार तालुक्यातील १७, मेहकर तालुक्यातील ६ तसेच जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात विंधनविहिरी घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.   याशिवाय महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ मधील कलम २५ नुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्या अहवालाअन्वये जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई घोषित गावांमध्ये अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या ५00 मीटर अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील विहीर तात्पुरती बंद करून भूजल काढण्यासाठी, विहीत करण्यात येईल. कोणतीही व्यक्ती भूजल पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित करणार नाही, असे प्रशासनाचे आदेश आहेत.

रब्बी हंगामातील सिंचन क्षेत्र कमी होणारयावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्पात २२.१७ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षामध्ये यंदा सर्वात कमी जलसाठय़ाची नोंद करण्यात आली आहे. २१ सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २0१३ साली ४३६ दलघमी, २0१४ मध्ये ३५९ दलघमी, २0१५ मध्ये २६0 दलघमी जलसाठ्याची नोंद करण्यात आली होती. या तुलनेत यंदाच्या जलसाठा सर्वात कमी ११८ दलघमी आहे. त्यामुळे भविष्यात जलसंकट निर्माण होणार असून, यावर्षी रब्बी हंगामातील सिंचन क्षेत्र कमी होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी