शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

ध्वनिप्रदूषण करणा-याला आता तुरुंगवास!

By admin | Updated: February 19, 2017 02:09 IST

तक्रारीसाठी टोल फ्री नंबर : पोलिसांना दिला कारवाई करण्याचा आदेश.

खामगाव, दि. १८- ध्वनिप्रदूषण ही एक जटील समस्या झाली असून, ध्वनिप्रदूषण करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश शासनाने काढला आहे. त्यानुसार अशा व्यक्तीला तब्बल पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ अन्वये यासंदर्भात गुन्हाही नोंदविण्यात येणार आहे. यासाठी पोलीस यंत्रणेने नागरिकांना सजग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहनांची दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी त्या माध्यमातून होणारे ध्वनिप्रदूषण, तर लग्न मिरवणुकीत डीजे आणि फटाक्यांच्या आवाजमुळे ध्वनिप्रदूषणामध्ये भर पडत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येते. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी आता शासनाने ध्वनिप्रदूषणाचे नियम कडक केले आहेत. ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम समाजाच्या प्रत्येक घटकावर जाणवू लागले आहेत. हे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. अलीकडे तर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांंची शासन मदत घेत आहे. नागरिकांनी काही नियम पाळलेत, तर ध्वनिप्रदूषणाची तीव्रता कमी होऊ शकते. त्याअनुषंगाने पोलीस यंत्रणेने ध्वनिप्रदूषणात तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. ध्वनिप्रदूषण नियंत्रणाकरिता पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. अशी आहे शिक्षेची तरतूद ध्वनिप्रदूषण केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम १५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येईल व त्यास पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच शिक्षा होऊनसुद्धा असे गुन्हे चालू ठेवल्यास प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपये दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. यावर करण्यात आली बंदी रात्री १0 ते सकाळी ६ वाजेपयर्ंत ध्वनिक्षेपक, पब्लिक अँड्रेस सिस्टमचा उपयोग करता येणार नाही. तसेच लाउडस्पिकर, फटाके, वाद्य वाजविण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ध्वनिप्रदूषणावर (नियंत्रण नियमन) नियम २000 च्या कलम ३(१) आणि ४ (१) नुसार आवाजाच्या गुणवत्तेची मानके निश्‍चित केली आहेत. रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयाचे सभोवतालचे १00 मीटरपयर्ंतचे क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.