शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाहाच्या ठिकाणीही पोहोचणार आता बस!

By admin | Updated: March 28, 2017 01:39 IST

एसटी महामंडळाचा उपक्रम; गर्दी तेथे एसटी संकल्पना येणार प्रत्यक्षात.

अनिल गवई खामगाव, दि. २७- तोट्यातील 'एसटी'ला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, खामगाव आगाराकडून आता सामूहिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणीही थेट एसटीची सेवा देण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. 'हात दाखवा, एसटी थांबवा' या उपक्रमाच्याच धर्तीवर '४0 प्रवासी जमवा, एसटी बोलवा' या अभियानाची मुहूर्तमेढ गुढीपाडव्यापासून रोवल्या जाणार असल्याची माहिती आहे.एसटी महामंडळाच्या दररोज जवळपास १४ हजार ९00 फेर्‍या तोट्यात धावत असून, या फेर्‍यांमुळे वर्षाला २४0 कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील ३७ हजार ४१७ खेडेगावांसह शहरी भागातील प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधेचाही समावेश असून,आता अधिक प्रवासी असलेल्या ठिकाणी थेट एसटी पाठविण्याची अंमलबजावणी एसटी महामंडळाकडून केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर गर्दी आणि यात्रेच्या ठिकाणी एसटीची विशेष सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.खासगी प्रवासी वाहतुकीला बसणार आळा!४शहरी व ग्रामीण भाग यातील एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे एसटी मानली जाते; मात्र राज्यातील ग्रामीण भाग आणि खास करून दुर्गम भागात ह्यबंधनकारकह्ण सेवा देताना एसटी महामंडळाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागते. दरम्यान, राज्यातील सुमारे ७ हजार मार्गांना अवैध वाहतुकीचा विळखा आहे. या अवैध वाहतुकीमुळे बाधित झालेल्या मार्गावरील आर्थिक तूट भरून काढण्यासाठीचा एक भाग म्हणून आगामी काळात ह्यगर्दी तेथे एसटीह्ण हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.एक कॉल करा, बस मिळवा!४प्रवासी वाढवा अभियानांतर्गत अधिक प्रवासी असलेल्या ठिकाणी खामगाव आगाराला माहिती दिल्यास, एस टी बसची सुविधा दिली जाणार आहे. जास्त प्रवासी असलेल्या ठिकाणी बससोबतच पर्यायी व्यवस्थाही करून दिली जाणार आहे. यामध्ये अधिक प्रवासी हाच निकष वापरण्यात येणार असल्याने, शटल सर्व्हिसचाही वेळेवर रूट चेंज करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.