शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अवैध पट्टे असणा-या ३५0 लोकांना भूदान यज्ञ मंडळाच्या नोटीस

By admin | Updated: February 24, 2016 02:13 IST

कागदपत्रे सादर न करणा-याचे पट्टे भूमिहिनांना देणार.

किशोर खैरे /नांदुरा बुलडाणा जिल्ह्यात भूदान यज्ञात मिळालेली जमीन अनेकांनी गैरमार्गाने खरेदी-विक्री केली आहे, असे प्रत्यक्ष पाहणीत आढळून येत असल्याने भूदानचे पट्टे ताब्यात असलेल्या ३५0 व्यक्तींना भूदान यज्ञ मंडळाचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी व सदस्य वसंत केदार यांनी मंगळवारी नोटीस पाठवल्या आहेत. या नोटीसनुसार संबंधित पट्टेधारकांनी कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित पट्टा रद्द करून गरीब व भूमिहिनांना वाटून देण्यात येईल, असा इशारा भूदान यज्ञ मंडळाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.विनोबा भावे यांनी १९५१ साली भूदान चळवळीची सुरुवात केली, त्यात विदर्भातून १ लाख ६0 हजार एकर जमीन भूदान यज्ञाला मिळाली तर संपूर्ण महाराष्ट्रात २ लाख १0 हजार एकर जमीन भूदानची आहे, या सर्व शेतजमीन हुडकून काढून भूमिहिनांना पुन्हा वहितीसाठी देण्याचे काम आचार्य हरिभाऊ वेरुळकर व त्यांचे सहकारी प्रामाणिकपणे करीत आहेत. संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील अनेक पट्टेधारकांनी संबंधित पटवार्‍यांना हाताशी धरुन भूदानऐवजी भूस्वामी वर्ग १ असा बदल करून भूदानच्या पट्टय़ाची सर्रास विक्री केली, तसेच अनेक ठिकाणी भूदान कायद्याच्या विरुद्ध अवैध हस्तांतरण व्यवहार आणि शासनाच्या रेकॉर्डवर चुकीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात चार हजार ५00 एकर शेती भूदानची असून, प्रत्यक्षात मात्र २ हजार २७९ एकर जमीन भूदान यज्ञामध्ये मिळालेली आहे, उरलेली २ हजार २२१ एकर जमिनीचा थांगपत्ता लागत नाही, या जमिनीपैकी अनेक जमिनी या वहिवाटदारांनी सरकारी कर्मचार्‍यांना हाताशी धरुन विकल्या आहेत. वास्तविक भूदानची जमीन पडीत ठेवता येत नाही. इतरांना वहिवाटीसाठी देता येत नाही. वडिलोपाजिर्त वारसदारांना ती मिळत असते; मात्र जिल्ह्यातील भूदान जमीन अनेकांकडे पडीत आहे. ही तर काही पट्टेधारकांनी प्रत्यक्ष पडीत जमीन असतानाही ७/१२ वर मात्र वहीत असल्याचे दाखविले आहे. याबाबत पटवारी असा सातबारा कसा काय देतात, असा प्रश्न उपस्थित करून आचार्य वेरूळकर यांनी याबाबतची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारही केली आहे.