शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खामगाव-जालना रेल्वेमार्गाचा साधा उल्लेखही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:38 IST

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एकमेव मार्ग ठरणारा आहे. हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्याच्या विकासास मोठा हातभार लागेल; मात्र या ...

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एकमेव मार्ग ठरणारा आहे. हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्याच्या विकासास मोठा हातभार लागेल; मात्र या रेल्वेमार्गाबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट न झाल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेण्याचे जाहीरपणे आश्वासन दिल्यानंतरही केवळ सर्वेक्षणाच्या पुढे हा रेल्वेमार्ग जाऊ शकला नाही. स्वातंत्र्योत्तर काळापासून हा रेल्वेमार्ग प्रलंबित आहे. मग, अडचण नेमकी काय आहे? आता तर रेल्वे राज्यमंत्रीसुद्धा राज्याचे, त्यातल्या त्यात विदर्भाच्या सीमेवरील मराठवाड्याचे आहेत, असेही त्या म्हणाल्या.

पक्षभेद टाळून सर्वचजण अनेक वर्षांपासून जनआंदोलन करीत आहेत. निवडणुकीतही इथल्या जनतेने या मुद्यावरून वेळोवेळी साथ दिली आहे, अजून इथल्या जनतेने काय दिले पाहिजे, म्हणजे हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल? विदर्भाला मराठवाड्याशी जोडतानाच प्रामुख्याने मागास समजल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाला, सिंदखेडराजा व लोणार सारख्या महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्राला चालना व गती मिळण्यासाठी हा रेल्वेमार्ग गरजेचा आहे. रावसाहेब दानवे यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाल्याने हायसे वाटले होते. तथापि खामागाव-जालना रेल्वेमार्गाला ते प्राधान्य देतील ही अपेक्षा होती. मात्र, याबाबत त्यांनी एका शब्दानेही साधा उल्लेख देखील केला नाही. त्यानुषंगाने दानवेंनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे त्या म्हणाल्या.

--पुरणपोळीचे आमिष देऊन चटणी-भाकरीकडे दुर्लक्ष !--

जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बाजूने हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. बुलेट ट्रेन करताय, याबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही; मात्र ते होत असताना विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या खामगाव-जालना रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब म्हणजे उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेली रोजची चटणी-भाकर न देता, तुम्ही आम्हाला पुरणाची पोळी आणि तूप देण्याचे आमिष देण्यासारखे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.