शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव-जालना रेल्वेमार्गाचा साधा उल्लेखही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:38 IST

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एकमेव मार्ग ठरणारा आहे. हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्याच्या विकासास मोठा हातभार लागेल; मात्र या ...

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एकमेव मार्ग ठरणारा आहे. हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्याच्या विकासास मोठा हातभार लागेल; मात्र या रेल्वेमार्गाबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट न झाल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेण्याचे जाहीरपणे आश्वासन दिल्यानंतरही केवळ सर्वेक्षणाच्या पुढे हा रेल्वेमार्ग जाऊ शकला नाही. स्वातंत्र्योत्तर काळापासून हा रेल्वेमार्ग प्रलंबित आहे. मग, अडचण नेमकी काय आहे? आता तर रेल्वे राज्यमंत्रीसुद्धा राज्याचे, त्यातल्या त्यात विदर्भाच्या सीमेवरील मराठवाड्याचे आहेत, असेही त्या म्हणाल्या.

पक्षभेद टाळून सर्वचजण अनेक वर्षांपासून जनआंदोलन करीत आहेत. निवडणुकीतही इथल्या जनतेने या मुद्यावरून वेळोवेळी साथ दिली आहे, अजून इथल्या जनतेने काय दिले पाहिजे, म्हणजे हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल? विदर्भाला मराठवाड्याशी जोडतानाच प्रामुख्याने मागास समजल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाला, सिंदखेडराजा व लोणार सारख्या महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्राला चालना व गती मिळण्यासाठी हा रेल्वेमार्ग गरजेचा आहे. रावसाहेब दानवे यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाल्याने हायसे वाटले होते. तथापि खामागाव-जालना रेल्वेमार्गाला ते प्राधान्य देतील ही अपेक्षा होती. मात्र, याबाबत त्यांनी एका शब्दानेही साधा उल्लेख देखील केला नाही. त्यानुषंगाने दानवेंनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे त्या म्हणाल्या.

--पुरणपोळीचे आमिष देऊन चटणी-भाकरीकडे दुर्लक्ष !--

जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बाजूने हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. बुलेट ट्रेन करताय, याबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही; मात्र ते होत असताना विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या खामगाव-जालना रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब म्हणजे उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेली रोजची चटणी-भाकर न देता, तुम्ही आम्हाला पुरणाची पोळी आणि तूप देण्याचे आमिष देण्यासारखे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.