शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बुलडाणा जिल्ह्यातील अशासकीय समित्या रखडल्या!

By admin | Updated: April 11, 2017 00:12 IST

शिवसेना-भाजपाची ओढाताण; दोन वर्षांपासून कार्यकर्ते वा-यावर.

मेहकर : महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील अशासकीय समित्यावरील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. शिवसेना-भाजपच्या ओढाताणीमध्ये शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते वार्‍यावर फिरताना दिसत आहेत.महसूल विभागातील विविध कार्यालयातील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर पाच वर्षांनंतर सत्ताधारी पक्षाकडून अशासकीय समित्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात. या समित्यांवर सत्ताधारी पक्षातील निष्ठावान व होतकरु कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात. गेल्या दोन वर्षांंपूर्वी महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तारुढ झाले आहे. परंतु बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही समित्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. अशासकीय समित्यांमध्ये दक्षता समिती, संजय गांधी निराधार योजना समिती व रोजगार हमी योजना समिती या तीन समित्यांचा समावेश आहे. ह्या तीनही समित्या गेल्या दोन वर्षांपासून बरखास्त झालेल्या आहेत. मात्र नव्याने या समित्यांच्या नियुक्त्या झालेल्याच नाहीत. त्यामुळे समितीचे कामकाज शासकीय अधिकारी, कर्मचारीच पाहतात. बुलडाणा जिल्ह्याचे राजकीय समीकरण पाहता खासदार हे शिवसेनेचे आहेत, तर सात आमदारांपैकी शिवसेनेचे दोन, भाजपाचे तीन व काँग्रेसचे दोन, असे पक्षीय बलाबल आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार असेल, त्या ठिकाणी त्या पक्षाचे ६0 टक्के व इतर सत्तेतील पक्षाचे ४0 टक्के असे अंतर्गत समीकरण ठरल्याचे समजते. सध्या जिल्ह्यामध्ये भाजप-शिवसेनेमध्ये पक्ष वाढीसाठी व विविध ठिकाणी आपलीच सत्ता येऊन आपल्याच पक्षाचे वर्चस्व असले पाहिजे. यासाठी शिवसेना व भाजप पक्षामध्ये अंतर्गत चढाओढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्ष सत्तेमध्ये असले, तर ठिकठिकाणी अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे. पक्षाच्या या चढाओढीत व ताणाताणीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अशासकीय समित्या संदर्भात वार्‍यावर हिंडताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षभेद बाजूला ठेवून अशासकीय समित्यांच्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात, अशी मागणी होत आहे.