शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

नोटाबंदीचा पेरणीला लगाम!

By admin | Updated: November 18, 2016 02:44 IST

बुलडाणा जिल्ह्यात दहा दिवसात १६ टक्केच पेरणी.

विवेक चांदूरकरबुलडाणा, दि. १७-ऐन रब्बी हंगामातील पेरणीच्यावेळी नोटा बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकर्‍यांकडे बियाणे, खते व विविध साहित्य खरेदी करण्यासाठी पैसेच नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीही प्रभावित झाली आहे. जिल्हय़ात ७ नोव्हेंबरपर्यंंत ४0 टक्के पेरणी झाली होती. यामध्ये अधिक गती येणे आवश्यक असतानाच ५६ टक्के पेरणी झाली आहे. दहा दिवसांपूर्वी शासनाने ५00 व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे याचा परिणाम सर्वच स्तरावर पडला आहे. या निर्णयामुळे कृषी क्षेत्रातील बहुतांश व्यवहार ठप्प पडले आहेत. वर्‍हाडात दिवाळीनंतर रब्बी हंगामाला सुरुवात होते. नोव्हेंबर महिन्यात शेतकरी गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका यासह रब्बी पिकांची पेरणी करतात. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी ५00 व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. तर बँकेतून केवळ चार हजार रुपयेच बदलून घेण्याची मुभा दिली. त्यामुळे शेतकर्‍यांकडे बियाणे, खत खरेदीसाठी तसेच मजुरांना पेरणीचे पैसे देण्यासाठी पैसेच नाहीत. परिणामी शेतकर्‍यांनी पेरणी पुढे ढकलली आहे. शासनाने नोटा बंदीचा निर्णय घेईपर्यंंत जिल्हय़ात ४0 टक्के पेरणी झाली होती. त्यानंतर दहा दिवसात पेरणी मोठय़ा प्रमाणात वाढणे अपेक्षित होते. मात्र, गत दहा दिवसात केवळ १६ टक्के पेरणी झाली. १६ नोव्हेंबरपर्यंंत जिल्हय़ात ५६ टक्के पेरणी झाली आहे. जिल्हय़ात एकूण रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १,३४,३९५ हेक्टर आहे तर ७ नोव्हेंबरपर्यंंत ४0 टक्के म्हणजे ५४,८0३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. तर गत दहा दिवसात यामध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली असून, एकूण हेक्टरवर पेरणी झाली आहे. बाजार समिती बंदचा फटका शेतकरी खरीप हंगामातील पिकांची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशातून रब्बीची पेरणी करण्याकरिता बियाणे व खत खरेदी करतात; मात्र यावर्षी गत दहा दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील सोयाबीनसह अन्य शेतमालाची विक्री केलीच नाही. त्यामुळे शेतकर्‍यांकडे रब्बी हंगामात पेरणी करण्याकरिता पैसेच नाहीत. हरभरा व गव्हाची पेरणी अधिक जिल्हय़ात रब्बी हंगामात हरभरा व गव्हाची मोठय़ा प्रमाणात पेरणी करण्यात येते. यावर्षी आतापर्यंंंत १0,१९१ हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली तर ५३,६५४ हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी करण्यात आली आहे. गत दहा दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. तसेच बाजारपेठेत पैसेच नाहीत. बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. उधार देण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी सध्या स्थगित ठेवली आहे. बँकेतून मुबलक पैसे मिळाल्यावर रब्बीच्या पेरणीला प्रारंभ करू. - प्रदीप पवार, शेतकरी, अजिजपूर