शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ना पुस्तके ना वही, तरीही ऑनलाइन शिक्षणाची घाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 12:00 IST

Education Sector News : शैक्षणिक सत्रास सुरुवात करण्याची घाई करण्यात आली असल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

- सुधीर चेके पाटीलचिखली : विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवे शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शाळा सुरू होणार आहेत. काही मोजक्या शाळांचा अपवाद वगळता इतर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी मागचे वर्ष पाठ्यपुस्तकाविना कसेबसे ढकलले आहे. त्यात यंदाही पाठ्यपुस्तके उपलब्ध नसताना आणि ऑनलाइन शिक्षणात शिक्षकांना मर्यादा व अडचणी असताना  शैक्षणिक सत्रास सुरुवात करण्याची घाई करण्यात आली असल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. नोव्हेंबरमध्ये इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये ५ वीपासून पुढील वर्ग भरविण्यात आले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट धडकली आणि सर्व शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. यामध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेबाबतही गोंधळ  उडाला असतानाच आता तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याची भीती असल्याने यंदाही विद्यार्थ्यांना स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून केवळ बाराखडी, आकडेमोड या पद्धतीचेच शिक्षण घ्यावे लागणार आहे. दरम्यान, विदर्भात २८ जून पासून नवीन शैक्षणिक सत्र या पद्धतीनेच सुरू होत आहे. गतवर्षी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना दिवसभरात अथवा एक-दोन दिवसांत एखादा धडा विद्यार्थ्यांना शिकविला जात होता. त्यातही पाठ्य-पुस्तके नसल्याने प्रामुख्याने इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व डोक्यावरून जाणारे ठरले. दरम्यान, स्वाध्याय उपक्रमास सुरुवात झाली. यामध्ये चिखली तालुका राज्यात अव्वल ठरला असला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या माध्यमातून भरून निघणारे नाही. परिणामी गतवर्षाचा पूर्ण अभ्यास बुडाला असे असले तरी आता प्रमोट होऊन पुढच्या वर्गात दाखल होणारे विद्यार्थी अभ्यासक्रमाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. प्रामुख्याने विद्यार्थ्यांकडे साधनसुविधांचा अभाव असल्याने ऑनलाइन शिक्षणात यश नाही, हे गतवर्षीच सिद्ध झालेले आहे. त्यात यंदाही पाठ्यपुस्तकेच उपलब्ध नसल्याने शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने शिकविले तरी ते समजणे अवघड आहे.  ऑनलाइन शिक्षण देण्याबाबत शिक्षकांसमोरही मर्यादा आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांतही संभ्रम आहे. ४६ हजार ५९ विद्यार्थी होणार प्रमोट चिखली तालुक्यात गतवर्षी इयत्ता १ ते १० पर्यंत एकूण ४६ हजार ५९ विद्यार्थीसंख्या होती. या विद्यार्थ्यांना यंदा ढकलपास (प्रमोट) करण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा प्रथमच इयत्ता पहिलीत नवप्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही प्रवेशाबाबत संभ्रमावस्था आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducationशिक्षण